High Commissioner : माजी रेल्वे मंत्री झाले बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त

नवी दिल्ली : देशाचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी आता बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त झाले आहेत. त्यांनी प्रणय वर्मा यांच्याकडून बांगलादेशमधील भारताच्या उच्चायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रणय वर्मा आता ब्रुसेल्समध्ये युरोपीयन संघात भारताचे राजदूत म्हणून काम करणार आहेत.


दिनेश त्रिवेदी एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे प्रभावी नेते होते. ते ममता बॅनर्जींचे विश्वासू म्हणून यूपीए सरकारच्या काळात १३ जुलै २०११ ते १८ मार्च २०१२ दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. पण रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वाद झाला. यानंतर दिनेश त्रिवेदी यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. हळू हळू त्यांचे तृणमूलमधील महत्त्व कमी होत गेले. अखेर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी तृणमूलचा राजीनामा देऊन दिनेश त्रिवेदी बाहेर पडले. त्यांनी ६ मार्च २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आता ७५ वर्षांचे असलेल्या यांनी बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.


कोणत्याही देशात उच्चायुक्त, राजदूत अशा पदांवर परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती होते. या पदावर एका ज्येष्ठ नेत्याची नियुक्ती करून केंद्र सरकारने बांगलादेश सोबतच्या राजकीय संबंधांना भारत विशेष महत्त्व देतो याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बंगाली संस्कृतीची जाण असलेल्या दिनेश त्रिवेदी यांना बांगलादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून काम करणे सोपे जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.


उच्चायुक्त नियुक्तीची माहिती मिळताच पश्चिम बंगालमधील भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आणि दिनेश त्रिवेदींचे नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन केले.

Comments
Add Comment

LPG Price Hike : गॅस सिलेंडरच्या दरांचा पुन्हा भडका! केंद्राचा इशारा; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजी गॅस

Devendra Fadnavis : पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा तिढा अखेर सुटला; "हा महादेव भक्तांचा विजय!" - मुख्यमंत्री फडणवीस

ठाणे : "महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित प्रश्न अखेर

Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश मुंबई (विशेष

Visakhapatnam Steel Plant : विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात दुर्घटना, वितळलेले स्टील अंगावर पडले आणि...

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात मोठी दुर्घटना झाली. काम सुरू असताना वितळलेले

Advisory For Indians : भारतीयांना तत्काळ इराण सोडण्याचे आदेश

तेहरान : इराणआणि इस्रायलमधील लष्करी संघर्ष कमालीचा वाढला असून मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा