मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकी महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे खेळला गेला, ज्यात भारतीय संघाला सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी डावाची सुरुवात केली आणि पाच षटकांत पहिल्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. वर्मा २० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा करून बाद झाली. भारतासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या स्मृती मानधनाला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही आणि ती केवळ १३ धावाच करू शकली. पण, या छोट्याशा खेळीदरम्यान तिने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
अहमदाबाद : गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, ...
रोहित शर्माला मागे टाकत मानधना आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू बनली आहे. मानधनाच्या नावावर आता ४,२४४ धावा आहेत, तर रोहितने ४,२३१ धावा केल्या आहेत. विराट कोहली आता ४,१८८ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ३,८६९ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादव ३,२७२ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
मुंबई : मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खेळाडूंना त्यांच्या ...
याव्यतिरिक्त, मानधना आता बाबर आझमच्या विश्वविक्रमाच्या जवळ पोहोचत आहे. बाबरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,५९६ धावा केल्या आहेत आणि मंधाना त्याच्यापेक्षा फक्त ३५२ धावांनी मागे आहे. जर तिचा फॉर्म असाच टिकून राहिला, तर येत्या सामन्यांमध्ये हा विक्रम मोडला जाऊ शकतो.केवळ महिला क्रिकेटचा विचार केल्यास, मानधना सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या पुढे न्यूझीलंडची दिग्गज सुझी बेट्स आहे, जिच्या नावावर ४,७१७ धावा आहेत. मंधानाकडे तिला मागे टाकण्याची चांगली संधी आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकांत ४ गडी गमावून १५८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. डावाची सुरुवात करताना, कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने ३९ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ५१ धावा केल्या. अनेरी डर्कसन ३४ चेंडूंमध्ये ४४ धावांवर नाबाद राहिली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. कोल ट्रायन १६ चेंडूंमध्ये १८ धावांवर नाबाद राहिली. भारताकडून श्रेयंका पाटीलने ४ षटकांत २६ धावा देऊन २ बळी घेतले. अरुंधती रेड्डी आणि श्री चरानी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना रविवारी त्याच मैदानावर खेळला जाणार आहे.