Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या खेळाचा आता पगार मिळणार असून खेळाडूंचा आर्थिक प्रश्न लवकरात लवकर सुटणार असून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. आता केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाच नाही, तर मुंबईच्या देशांतर्गत खेळाडूंनाही 'सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट' म्हणजेच वार्षिक पगार दिला जाणार आहे आणि अशी प्रणाली लागू करणारी मुंबई ही देशातील पहिली राज्य संघटना ठरलीय.




श्रेण्यांनुसार पगार


देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करारबद्ध करणारी मुंबई ही देशातील पहिली क्रिकेट संघटना आहे. ठरलेल्या श्रेण्यांनुसार अ श्रेणीतील खेळाडूंना १२ ते २० लाख, बी श्रेणीतील खेळाडूंना ८ ते १२ आणि तर क श्रेणीतील खेळाडूंना ६ ते ८ लाख पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मॅच फी आणि दैनंदिन भत्त्यांव्यतिरिक्त असणार आहे. म्हणजे मुंबईच्या खेळाडूंना आता आर्थिक विवंचनेशिवाय फक्त खेळावर लक्ष केंद्रित करता येईल.


">मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक स्पष्टीकरण देत म्हणाले आहे की, " मुंबई क्रिकेटमधील एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. अशी करारबद्ध पद्धत राबवणारी मुंबई ही देशातील पहिली क्रिकेट संघटना आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या करारामुळे मुलांना चांगले आर्थिक स्थैर्य मिळेल शिवाय मुंबईसाठी अधिक खेळण्याची हिंमतही वाढेल.


या करारामुळे मुंबईच्या खेळाडूंमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे, मुलांनी क्रिकेट संघटनेचे आभार मानले आहे. खेळात आडव्या येणाऱ्या पैशाच्या अडचणी आता लवकरच संपणार असून दडपण दूर होईल आणि खेळाडू आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.




अटी आणि शर्थी


खेळाडूंना या करारा चा लाभ घ्यायचा असल्यास पाच निकष पूर्ण करणे हे बंधनकारक असणार आहे.


१. खेळाडू मुंबई संघटनेकडे नोंदणीकृत असणे.
२. तंदुरुस्तीचे निकष पूर्ण केलेले असावेत
३. गेल्या दोन मोसमात कोणत्याही आयपीएल संघासह करारबद्ध नसावा.
४. तसेच शिफारशी समितीने निवड करणे आवश्यक आहे
५. भारत अ तसेच कनिष्ठ संघातून काही मोसमात खेळलेल्या खेळाडूंना हा करार लागू नसणार आहे.


भारतासाठी आपल्या खेळातून योगदान देणाऱ्या कितीतरी खेळाडूंची आर्थिक चणचण आता संपणार असून लवकरच नवीन तारे आपल्याला उभारताना दिसणार आहेत.

Tags
rakhi sawanttanvi kolteBigg Boss Marathi 6Vishal KotianRaqesh BapatDeepali Sayyad
Comments
Add Comment

ICC Hall of Fame : सौरव गांगुली आणि अंजुम चोप्राचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज, माजी पुरुष कर्णधार सौरव गांगुली आणि माजी

FIFA World Cup : फिफा वर्ल्ड कप गाजवून दक्षिण अफ्रिकाचा खेळाडू मायदेशी परतला पण...

जोहान्सबर्ग : फिफा विश्वचषक २०२६ मध्ये दमदार कामगिरी करून चर्चेत आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा युवा फुटबॉलपटू जेडन

Ind vs Zim : बीसीसीआयची मोठी घोषणा! इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात बदल

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका ४-० ने गमावल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

Healther Knight : भारताविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीनंतर हिथर नाइटची निवृत्ती; इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप !

लंडन : इंग्लंड महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार हिथर नाइट हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून

FIFA World Cup 2026 : स्वित्झर्लंडचा धूव्वा उडवत अर्जेंटिनाने केला सहाव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश; शेवटच्या क्षणी फिरला सामना !

मिसूरी: अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज (१२ जुलै) पार पडला. या सामन्यात

IND vs ENG : चॅम्पियन संघाचा खेळ असा का घसरला? श्रेयसच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सलग पराभव; ड्रेसिंग रूमपासून निवडीपर्यंत नेमकं काय चुकलं?

टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मान पटकावल्यानंतर भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यानंतरच्या आयर्लंड