Pune Airport : पुणे विमानतळावरून ९४ विमानांच्या फेऱ्या अचानक रद्द; जाणून घ्या कारण

पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीची शुक्रवारी रात्री नुकसान झाले. भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट चे हार्श लँडिंग झाल्यामुळे धावपट्टीवर आग पसरली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विमानतळावरून तब्बल ९४ विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.



नेमकी घटना काय?


भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट विमानाचे लँडिंग करत असताना विमानाचा गिअर बिघडला असल्याने धावपट्टीवर विमान अतिशय जोरात आदळले आणि सगळीकडे आगीचे लोट पसरले. या हार्श लँडिंगमुळे धावपट्टीच्या पृष्ठभागाचे नुकसान झाले. सुदैवाने पायलट सुरक्षित आहे, मात्र धावपट्टी खराब झाल्याने ती इतर विमानांच्या बाबतीत धोकदायक ठरू शकते याच गोष्टीची दक्षता घेत उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.



या कंपन्यांहूची विमाने रद्द ?


धावपट्टी बंद असल्याने विविध विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


इंडिगो : सर्वाधिक फटका इंडिगोला बसला असून ३७ विमाने रद्द करण्यात आली आहेत.


एअर इंडिया : ६ विमाने रद्द
एअर इंडिया एक्सप्रेस : १० विमाने रद्द
स्पाइसजेट : ३ विमाने रद्द
याव्यतिरिक्त इतर अनेक विमाने सुरत, गोवा आणि मुंबईकडे वळवण्यात आली आहेत.



इंडिगोचे प्रवाशांसाठी सोयी


विमान रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रवाशांना विमानाचे अपडेट्स देत असून ज्यांची विमान रद्द झाली आहेत, ते प्रवासी प्लॅन बी अंतर्गत फ्लाईट निवडू शकतात. किंवा पूर्ण परतावा घेऊ शकतात. इंडिगोने ट्विट करत याची संपूर्ण माहिती दिली आहे.


मुरलीधर मोहोळ काय म्हणाले


शिवाय केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत धावपट्टी लवकरात लवकर सुरळीत करू काम युद्धपातळीवर सुरु आहे सुरक्षित धावपट्टी होईपर्यंत नागरिकांना आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त