IPL 2026 MI vs PBKS : "काही कठीण निर्णय घेण्याची गरज आली आहे - हार्दिक पांड्या" ; मुंबईच्या अंतर्गत वादाचा खेळावर परिणाम?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत करत दणका दिला. त्यामुळे मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, संघाला आता "काही कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याची" आणि जबाबदारी स्वीकारण्याची गरज आली आहे. पांड्याचा हा संताप कोणाला उद्देशून आहे हे समजू शकले नसले तरी यावरून एवढं निश्चित झालं आहे की मुंबई संघाच्या अंतर्गत वादाचा परिणाम त्यांच्या खेळावर दिसून येत आहे.


सामन्यानंतर, पराभवाने निराश झालेल्या हार्दिक पांड्याने असे सांगितले की, "आम्हाला काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत की नेहमीप्रमाणेच पुढे जायचे आहे, हे पाहावे लागेल. या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्यावी लागतील आणि त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला नव्याने विचार करून वैयक्तिकरित्या, एक संघ म्हणून किंवा आमच्या नियोजनात कुठे कमतरता आहे, हे समजून घ्यावे लागेल."



या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने ६० चेंडूंमध्ये शानदार नाबाद ११२ धावा केल्या, परंतु त्याचे शतक विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्याने नमन धीरसोबत ६८ चेंडूंमध्ये १२२ धावांची भागीदारी केली, तर कर्णधार पांड्याने २३ चेंडूंमध्ये ४१ धावा जोडल्या. गोलंदाजीमध्ये, अर्शदीप सिंगने २२ धावांत ३ बळी घेत प्रभावी कामगिरी नोंदवली, तर शशांक सिंगने एक बळी घेतला.





">मुंबई संघाकडून मिळालेलं लक्ष्य पंजाब किंग्सने सहज गाठलं. प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ चेंडूंत १३९ धावांची विजयी भागीदारी रचली आणि संघाला केवळ १६.३ षटकांत विजय मिळवून दिला.



या पराभवानंतर मुंबईचा संघ या हंगामात आपले अंतर्गत मतभेद विसरून पुन्हा एकदा आपल्या गेमवर फोकस करणार का? याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष असणार आहे.

Tags
iplmumbai indianshardik pandyaIPL 2026internal dispute
Comments
Add Comment

भारतीय 'अ' संघाने श्रीलंकेला ६६ धावांनी पराभूत करत तिरंगी मालिका जिंकली

दंबुल्ला (श्रीलंका) : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक ९४ धावांच्या खेळीमुळे इंडिया 'अ' संघाने अंतिम सामन्यात

Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाला नेशन्स कपचे विजेतेपद

ऑकलंड : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच हॉकी नेशन्स कप २०२६ जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा

Varun Chakravarthy : आयर्लंड विरूद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर

Mumbai : भारतीय संघाने घरच्या मैदानावर शानदार खेळ करत अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी सामना तसेच तीन एकदिवसीय

FIFA World Cup 2026 : ऐतिहासिक घटना, एलॉय रूमने ९० मिनिटांत केले १५ सेव्ह ! इक्वेडोरला धक्का !!

मिसूरी : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये छोट्याशा कॅरिबियन देश कुरासाओने इतिहास रचला आहे. इक्वेडोरसारख्या बलाढ्य

FIFA World Cup 2026 : सुपरफास्ट वर्ल्डकप, फक्त ३३ सामन्यांत घडली अनोखी घटना

Mumbai : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये फक्त ३३ सामन्यांत १०० गोलची नोंद झाली आहे. याआधी १९८२ आणि २०१४ मध्ये ३६ सामन्यांत तर

Team India Squad Announcement : इंग्लंड दौऱ्यत विराट कोहलीचे पुनरागमन ? बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा !

Mumbai : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली