IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या संघाने यजमान मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला आणि ते आयपीएल २०२६ गुणतालिकेमध्ये नवव्या क्रमांकावर राहिले. पंजाब किंग्जने या विजयासह ९ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेताना आरसीबी व राजस्थान रॉयल्स यांना मागे ढकलेले. मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे क्विंटन डी कॉकचे वादळी शतक व्यर्थ गेले.


२ बाद १२ धावांवरून मुंबईला २०० पार जाण्याचे स्वप्न क्विंटन डी कॉक आणि नमन धीर यांनी दाखवले. अर्शदीप सिंगने दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेऊन पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. पण, त्यानंतर नमन व क्विंटन यांनी ६८ चेंडूंत १२२ धावा जोडल्या. नमन ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. क्विंटन ६० चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ११२ धावांवर नाबाद राहिला.अर्शदीप सिंहचे चार षटकांमध्ये २२ धावा देत तीन बळी घेतले. या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी करत आयपीएलमध्ये १५० बळी घेण्याचा विक्रम केला आहे.


आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून शतक झळकावणारा क्विंटन हा तिसरा ( लोकेश राहुल व संजू सॅमसन) फलंदाज ठरला. नमनची विकेट पडल्यानंतर मुंबईच्या धावांची गती मंदावली आणि त्यांना ६ बाद १९५ धावांपर्यंतच पोहोचता आले. त्यांनी २०-२५ धावा कमीच केल्या. प्रियांक आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात २१ धावा चोपल्या आणि ही त्यांची पहिल्या षटकातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी हैदराबादविरुद्ध मागील सामन्यात त्यांनी १८ धावा चोपल्या होत्या. पण, अल्लाह गझनफरने सलग दोन षटकांत पंजाबच्या प्रियांश आर्य ( १५) व कूपर कॉनली ( १७) यांना माघारी पाठवले.


पंजाबने ४५ धावांवर दोन फलंदाज गमावले. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर प्रभसिमरनचा झेल जसप्रीत बुमराहने सोडला. त्याचा फायदा उचलून त्याने २४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मुंबईची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण गचाळ झालेले पाहायला मिळाले. पंजाब किंग्स ने १० षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या होत्या. पंजाब किंग्सकडून सर्वाधिक दहा ५०+ धावांचा पराक्रम प्रभसिमरनने नावावर केला. डेव्हिड मिलर ( ९) व शॉन मार्श ( ६) या विक्रमात त्याच्या मागे आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरसोबत त्याने ५५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली.


प्रभसिमरनने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले आणि मुंबईने १३ व्या षटकापर्यंतच पराभव पत्करावा लागला. श्रेयसने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून वानखेडेवरील त्याचा फिफ्टीचा दुष्काळ संपवला. शार्दूल ठाकूरला सलग दोन षटकार खेचून श्रेयसने सामना पंजाबच्या ताटात आणून ठेवला. तो ३५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावांवर झेलबाद झाला आणि प्रभसिमरनसह त्याने ६७ चेंडूंत १३९ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. पंजाबने १६.३ षटकांत १९८ धावा करून २१ चेंडू राखत ७ विकेट्सने विजय मिळवला. प्रभसिमनर ३९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला.जसप्रीत बुमराहला आजच्या सामन्यातही बळी मिळाला नाही. चार षटकांमध्ये त्याने ४१ धावा दिल्या, तर दुसरीकडे दीपक चाहरने २.३ षटकांमध्ये ४५ धावा दिल्याने तो महागडा गोलंदाज ठरला. हार्दिक पंड्याने ३ षटकांमध्ये ३९ धावा तर शार्दूल ठाकूरने ३ षटकांमध्ये ४२ धावा दिल्या.

Comments
Add Comment

भारतीय 'अ' संघाने श्रीलंकेला ६६ धावांनी पराभूत करत तिरंगी मालिका जिंकली

दंबुल्ला (श्रीलंका) : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक ९४ धावांच्या खेळीमुळे इंडिया 'अ' संघाने अंतिम सामन्यात

Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाला नेशन्स कपचे विजेतेपद

ऑकलंड : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच हॉकी नेशन्स कप २०२६ जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा

Varun Chakravarthy : आयर्लंड विरूद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर

Mumbai : भारतीय संघाने घरच्या मैदानावर शानदार खेळ करत अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी सामना तसेच तीन एकदिवसीय

FIFA World Cup 2026 : ऐतिहासिक घटना, एलॉय रूमने ९० मिनिटांत केले १५ सेव्ह ! इक्वेडोरला धक्का !!

मिसूरी : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये छोट्याशा कॅरिबियन देश कुरासाओने इतिहास रचला आहे. इक्वेडोरसारख्या बलाढ्य

FIFA World Cup 2026 : सुपरफास्ट वर्ल्डकप, फक्त ३३ सामन्यांत घडली अनोखी घटना

Mumbai : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये फक्त ३३ सामन्यांत १०० गोलची नोंद झाली आहे. याआधी १९८२ आणि २०१४ मध्ये ३६ सामन्यांत तर

Team India Squad Announcement : इंग्लंड दौऱ्यत विराट कोहलीचे पुनरागमन ? बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा !

Mumbai : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली