TCS Employee Allegation : "मूल होत नसेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव"; नाशिक TCS मधील 'धर्मांतरण गँग'चा अमानवीय छळ!

नाशिक : नाशिक येथील टीसीएस (TCS) शाखेत धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात पीडित महिलांनंतर आता एका पुरुष कर्मचाऱ्याने आपली आपबिती सांगितली असून, त्याने केलेले खुलासे अंगावर शहारे आणणारे आहेत. या कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याला केवळ जबरदस्तीने टोपी घालण्यास आणि नमाज पठण करण्यास भाग पाडले गेले नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याचाही क्रूर अपमान करण्यात आला. आरोपीने त्याला म्हटले की, "जर उपचार करूनही तुला मूल होत नसेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठवून दे." अशा शब्दांत त्याचा मानसिक छळ करण्यात आला.



२०२२ पासून सुरू झाला छळाचा प्रवास


पीडित कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा छळ २०१२ मध्ये त्याने कंपनीत रुजू झाल्यापासून सुरू झाला होता. त्याचा टीम लीड तौसिफ अख्तर आणि त्याचा सहकारी दानिश शेख यांनी संगनमताने त्याला लक्ष्य केले. कामाच्या ठिकाणी आपल्या अटी मान्य करण्यासाठी ते सर्व कर्मचाऱ्यावर दबाव टाकत असत. जे कर्मचारी त्यांच्या धार्मिक अटी मान्य करत नसत, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा टाकून त्यांना त्रस्त केले जात होते.



महिला कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप आणि एफआईआर


या प्रकरणात २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तौसिफ आणि दानिश यांची नावे प्रामुख्याने आहेत. दानिशने पीडित महिलेला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि लग्नासाठी दबाव टाकला. इतकेच नाही तर तौसिफ आणि एचआर निदा खान यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एका महिला अधिकाऱ्याला गुप्त एजंट म्हणून कंपनीत पाठवून तपास केला आहे.



सात आरोपींना अटक, पोलिसांकडून नऊ गुन्हे दाखल


या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच पुरुष आणि दोन महिला अशा एकूण सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अनेक महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी या टोळीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. पीडित पुरुष कर्मचाऱ्याने सांगितले की, हे सर्व आरोपी वारंवार हिंदू धर्माचा अपमान करत असत आणि महाराष्ट्रातील आदरणीय महापुरुषांबद्दलही हीन दर्जाची विधाने करत असत.



शाकाहारी कर्मचाऱ्याला मांसाहार खाण्याची सक्ती


धर्मांतराच्या या कटात कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही हल्ला करण्यात आला. पीडित कर्मचाऱ्याने सांगितले की, तो कट्टर शाकाहारी असूनही नाईट शिफ्ट संपल्यानंतर त्याला जबरदस्तीने हॉटेल्समध्ये नेले जायचे. तिथे त्याच्यावर मांसाहारी जेवण घेण्यासाठी दबाव टाकला जात असे. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा त्याच्या धार्मिक श्रद्धेची चेष्टा केली जायची.



नमाज पठण आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल


२०२३ च्या ईदच्या दिवशी तौसिफ याने पीडित कर्मचाऱ्याला आपल्या घरी नेले. तिथे त्याला जबरदस्तीने धार्मिक टोपी घालण्यास लावली आणि नमाज वाचायला लावला. इतक्यावरच न थांबता, त्याचे फोटो काढून त्याला अपमानित करण्यासाठी ऑफिसच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले. जेव्हा पीडिताने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा तौसिफने त्याला टेबल फॅन फेकून मारले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.



'इस्लाम स्वीकारा तरच वडील बरे होतील' असा दावा


जेव्हा पीडित कर्मचाऱ्याचे वडील अर्धांगवायूने (पॅरालिसिस) आजारी पडले, तेव्हा तौसिफ, दानिश, शाहरुख आणि रजा मेनन यांसारख्या लोकांनी त्याला इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला दिला. "तू इस्लाम स्वीकारला तरच तुझे वडील बरे होतील," असे त्यांनी सांगितले. पीडिताने त्यांचे ऐकले नाही, तेव्हा त्याच्याविरुद्ध कंपनीच्या मुख्य कार्यालयात खोट्या तक्रारी करून त्याला नोकरीवरून काढून टाकण्याचे षडयंत्र रचले गेले. हा छळ २३ मार्च २०२६ पर्यंत सुरू होता.



मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा आणि मानसिक खच्चीकरण


आरोपींनी सुरुवातीला मैत्रीचे नाते निर्माण केले आणि त्यानंतर हळूहळू आपला खरा हेतू स्पष्ट केला. पीडित कर्मचाऱ्याला वारंवार गळ्यातील रुद्राक्ष काढायला लावले आणि कलमा वाचायला लावला. त्याला मानसिकदृष्ट्या इतके तोडले गेले की त्याने धर्मांतर करावे, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Amalner Drowning Incident : सेल्फीचा मोह जीवावर बेतला! अमळनेरमध्ये खदाणीत बुडून तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर येथे मंगळवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. चोपडा रस्त्यावरील

Pakistan : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पोलिसांवर हल्ला, ९ पोलीस ठार

झियारत : पाकिस्तानच्या (Pakistan) नैऋत्येकडील भागात बलुचिस्तान (Balochistan) प्रांताच्या झियारत जिल्ह्यात (Ziarat district) पोलिसांवर

Class 11 admission 2026 : ११ वी अ‍ॅडमिशन चुकलं? विद्यार्थिनींसाठी पुन्हा सुवर्णसंधी; विशेष फेरी-२ची घोषणा

- बुधवार १५ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू होणार मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश

Devendra Fadnavis : नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी

वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक मुंबई : केंद्रीय

Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

- विविध विकास कामांसाठी एकूण १० कोटींचा विशेष निधी मंजूर! मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार

India Indonesia Agreements : भारत-इंडोनेशियात संरक्षण, खनिज, बंदर विकासासह अनेक महत्त्वाचे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याला मोठे यश जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया