Mathadi Workers : कंबरतोड ओझ्यापासून माथाडी कामगारांची सुटका

बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक


मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राबणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कांदा, बटाटा व इतर शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांचा भार उचलणाऱ्या कामगारांचा भार काहीसा हलका होणार आहे.




आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन क्र. १२७ नुसार, कोणत्याही कामगाराकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेऊ नये, असा नियम आहे. केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले होते. त्यानुसार कामगार आयुक्तांनी २००० सालीच परिपत्रक काढले होते, मात्र बाजार समित्यांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. अखेर, विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर १ एप्रिल २०२६ रोजी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला.


त्यानुसार, बाजार समित्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपर्यंतच ठेवण्याबाबत जनजागृती करावी, व्यापाऱ्यांनी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या भरू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात याव्यात, या नियमाबाबत बाजार समिती आवारात पुरेशी प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून सर्वांना याची कल्पना येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित


या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बाजार समितीचे सचिव, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही वजन मर्यादा लागू करताना बाजार समितीचे दैनंदिन कामकाज प्रभावित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. या प्रक्रियेचा वेळोवेळी अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे

Comments
Add Comment

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

महापौराने दिले कारवाईचे सक्त आदेश मुंबई ; लोकमान्य टिळक टर्मिनस (एल टी टी ) जवळील स्वराज चौकात शनिवारी २० जून २०२६

PM Kisan : राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब

ST bus : ४० वारकरी एकत्र आल्यास थेट गावातूनच सुटणार 'लालपरी'

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार ५०० विशेष बसेस; महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठांना मोफत सेवा मुंबई :

Piyush Goyal : सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आढावा भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी,

Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर

Amit Shah : शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या