Mathadi Workers : कंबरतोड ओझ्यापासून माथाडी कामगारांची सुटका

बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक


मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राबणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कांदा, बटाटा व इतर शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांचा भार उचलणाऱ्या कामगारांचा भार काहीसा हलका होणार आहे.




आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन क्र. १२७ नुसार, कोणत्याही कामगाराकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेऊ नये, असा नियम आहे. केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले होते. त्यानुसार कामगार आयुक्तांनी २००० सालीच परिपत्रक काढले होते, मात्र बाजार समित्यांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. अखेर, विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर १ एप्रिल २०२६ रोजी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला.


त्यानुसार, बाजार समित्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपर्यंतच ठेवण्याबाबत जनजागृती करावी, व्यापाऱ्यांनी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या भरू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात याव्यात, या नियमाबाबत बाजार समिती आवारात पुरेशी प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून सर्वांना याची कल्पना येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित


या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बाजार समितीचे सचिव, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही वजन मर्यादा लागू करताना बाजार समितीचे दैनंदिन कामकाज प्रभावित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. या प्रक्रियेचा वेळोवेळी अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे

Comments
Add Comment

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Pydhonie Family News : ना कलिंगड, ना बिर्याणी, उंदिर मारण्याच्या औषधामुळे पायधुनीतील 'त्या' चौघांचा मृत्यू

मुंबई : पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला