Nitesh Rane : अमित शहांवर बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही

- मंत्री नितेश राणे; धमकीच्या आरोपांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा अभिजित दीपके यांना सल्ला


मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावर टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या राजकीय औकातीची मला कीव येते, अशी टीका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी केली. अस्तित्व संपलेल्या पक्षाच्या नेत्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.


सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार गृहमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्याचा निर्णय टिळक कुटुंबाने अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतःची राजकीय पत ओळखूनच टिप्पणी करावी, असे राणे म्हणाले. जंतरमंतर येथील घटनेवरून काँग्रेस अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तेथे आवश्यक ते पाऊल उचलण्यात आले होते. काँग्रेसने त्यांच्या काळातील पेपरफुटी आणि लाठीहल्ल्यांचा इतिहास आधी पाहावा, असेही ते म्हणाले.



अभिजित दीपके यांना मिळत असलेल्या धमक्यांच्या आरोपांवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आणि राज्य सरकारची आहे. दीपके यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलण्याऐवजी पोलीस ठाण्यात जाऊन पुराव्यासह तक्रार नोंदवावी. पोलीस निश्चितच संबंधितांवर कठोर कारवाई करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.




तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच राज्य प्रगतशील


ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबद्दल विचारले असता राणे म्हणाले की, मुंढे हे कायदे आणि शासन निर्णयांची तंतोतंत अंमलबजावणी करत आहेत. राज्यात त्यांच्यासारखे नियमाने काम करणारे असंख्य अधिकारी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अशाच शिस्तबद्ध कामाची प्रशासनाकडून अपेक्षा आहे. अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे आज महाराष्ट्राला प्रगतशील राज्य म्हणून ओळख मिळाली आहे, असे सांगत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Comments
Add Comment

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ₹2 लाखांची मदत जाहीर

पीएमएनआरएफमधून मृतांच्या कुटुंबीयांना ₹2 लाख, जखमींना ₹50 हजार ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी येथे कोहिनूर

Girish Mahajan : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश https://prahaar.in/2026/07/31/a-historic-first-for-india-a-live-heart-was-successfully-transported-from-surat-to-ahmedabad-via-the-vande-bharat-train/ मुंबई :

High Court on FDA : हायकोर्टाच्या दणक्यानं मंत्रालयातील कँटिनचं रूप पालटलं; अन्न सुरक्षेच्या नियमांची कडक अंमलबजावणी!

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या धसक्याने

Pune News : मुळशी फिरायला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! PMPML विशेष पर्यटन बस सुरू; अवघ्या ₹500 मध्ये निसर्ग सफर

पुणे स्टेशन ते मुळशी विशेष बससेवा सुरू; शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, मुळशी धरण आणि पळसे धबधबा एका ट्रिपमध्ये पुणे :

Mumbai Crime News : मुंबईतील रुग्णालयात धक्कादायक प्रकार; नवजात बाळ कचरापेटीत सापडल्याने खळबळ

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर (Trauma Care) रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय अविवाहित

BMC News : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामाला मंजुरी

पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत जलबोगदा उभारणीचा प्रस्ताव मंजूर मुंबई : मनोरी येथे