Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला मुकत आहेत. काही दिवसांआधी पुण्यात हिंजवडी परिसरात गारा पडल्या आणि वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा उष्णतेचा पारा चढला तो अगदी ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वातावरण बदलाचा फटका जाणवत आहे. काही भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस आहे तर काही ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांची नासाडी झाली आहे.



हवामान विभागाचा इशारा


बदलत्या वातावरणावर हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंत अंदाज व्यक्त असून उष्णेतची लाट आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासह १३ राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


https://prahaar.in/2026/04/16/tcs-conversion-gang-used-to-inflict-torture-male-employee-makes-revelation-accused-said-send-wife-with-me/

या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि मांडलेल्या तारखांनुसार मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान लाट येण्याचा अंदाज आहे. १६ ते १९ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक तसेच केरळ माहे येथे काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच १६ ते १९ एप्रिल दरम्यान छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात १६ ते २१ एप्रिल दरम्यान लाटेचा इशारा दिला आहे. तर गुजरात राज्याच्या किनारपट्टीतील भागांना देखील या उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


भारतावर पश्चिमी वाऱ्यासह एका पश्चिमी प्रणाली सक्रिय असल्याने १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळेच वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याहची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.



या आठ राज्यांना आहे पावसाचा इशारा


मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान ३० - ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामध्ये देखील राहणार आहे. यासोबतच राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिठीचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

Comments
Add Comment

Skill Centre : राज्यात लवकरच १०० महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

मुंबई : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा ज्योतिराव फुले

Minister Shivendrasinharaje Bhosale : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घरे होणार अधिक प्रशस्त

चटई क्षेत्रफळात वाढ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय मुंबई : राज्यातील शासकीय

Mathadi Workers : कंबरतोड ओझ्यापासून माथाडी कामगारांची सुटका

बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार

Shyam Steel in Maharashtra : श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाची राज्यात गुंतवणूक

मुंबई : राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Niyojan Bhavan : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन इमारतीचे भूमिपूजन

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा

BMC News : सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करा; सभागृह नेते गणेश खणकर यांची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत पावणे चार वर्षे प्रशासकीय राज्य होते. त्यामुळे समिती अध्यक्षांची दालन