Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला मुकत आहेत. काही दिवसांआधी पुण्यात हिंजवडी परिसरात गारा पडल्या आणि वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा उष्णतेचा पारा चढला तो अगदी ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वातावरण बदलाचा फटका जाणवत आहे. काही भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस आहे तर काही ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांची नासाडी झाली आहे.



हवामान विभागाचा इशारा


बदलत्या वातावरणावर हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंत अंदाज व्यक्त असून उष्णेतची लाट आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासह १३ राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


https://prahaar.in/2026/04/16/tcs-conversion-gang-used-to-inflict-torture-male-employee-makes-revelation-accused-said-send-wife-with-me/

या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि मांडलेल्या तारखांनुसार मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान लाट येण्याचा अंदाज आहे. १६ ते १९ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक तसेच केरळ माहे येथे काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच १६ ते १९ एप्रिल दरम्यान छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात १६ ते २१ एप्रिल दरम्यान लाटेचा इशारा दिला आहे. तर गुजरात राज्याच्या किनारपट्टीतील भागांना देखील या उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


भारतावर पश्चिमी वाऱ्यासह एका पश्चिमी प्रणाली सक्रिय असल्याने १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळेच वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याहची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.



या आठ राज्यांना आहे पावसाचा इशारा


मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान ३० - ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामध्ये देखील राहणार आहे. यासोबतच राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिठीचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

मुंबई : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे तसेच धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणींच्या

CSMT Mega Block : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! CSMT मेगा ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर - ठाण्यावरच थांबणार

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या पुनर्विकास कामामुळे प्रवाशांचा खोळंबा आणखी काही

Mumbai Gas Leak : दादरमध्ये गॅस पाइपलाइन फुटली, परिसरात खळबळ; शिवाजी पार्क- पोर्तुगीज चर्च मार्ग बंद

Dadar : मुंबई मधील दादर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. दादर पश्चिमेतील Portuguese Church परिसरात महानगर

Mumbai Coastal Road : मुंबईचा समुद्रकिनारा नटणार हिरवाईने! कोस्टल रोड शेजारी ६० हजार झाडांची लागवड; रिलायन्स फाउंडेशन उभारणार 'अर्बन फॉरेस्ट'

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुसाट आणि वेगवान करणाऱ्या 'मुंबई कोस्टल रोड' (Mumbai Coastal Road) प्रकल्पाच्या माध्यमातून आता

'मोफत गणवेश' योजनेतील भ्रष्टाचारावर अंकुश!

स्थानिक महिला बचत गटांना मिळणार शिवणकामाचे कंत्राट; निकृष्ट कापड पुरवल्यास पुरवठादारांवर होणार कायदेशीर

Monsoon Alert : येत आहे १०० किमी वेगानं महाभयंकर संकट, मान्सून घालणार धुमाकूळ ; 'या' राज्यांना अलर्ट

मुंबई : देशासह राज्यात सध्या उष्णतेने अक्षरशः कहर केला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रचंड