Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला मुकत आहेत. काही दिवसांआधी पुण्यात हिंजवडी परिसरात गारा पडल्या आणि वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा उष्णतेचा पारा चढला तो अगदी ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वातावरण बदलाचा फटका जाणवत आहे. काही भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस आहे तर काही ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांची नासाडी झाली आहे.



हवामान विभागाचा इशारा


बदलत्या वातावरणावर हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंत अंदाज व्यक्त असून उष्णेतची लाट आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासह १३ राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


https://prahaar.in/2026/04/16/tcs-conversion-gang-used-to-inflict-torture-male-employee-makes-revelation-accused-said-send-wife-with-me/

या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि मांडलेल्या तारखांनुसार मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान लाट येण्याचा अंदाज आहे. १६ ते १९ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक तसेच केरळ माहे येथे काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच १६ ते १९ एप्रिल दरम्यान छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात १६ ते २१ एप्रिल दरम्यान लाटेचा इशारा दिला आहे. तर गुजरात राज्याच्या किनारपट्टीतील भागांना देखील या उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


भारतावर पश्चिमी वाऱ्यासह एका पश्चिमी प्रणाली सक्रिय असल्याने १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळेच वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याहची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.



या आठ राज्यांना आहे पावसाचा इशारा


मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान ३० - ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामध्ये देखील राहणार आहे. यासोबतच राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिठीचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य