Fastag : 'फास्टॅग' चा जुगाड पडणार महागात; वसुलीत फेरफार करणाऱ्यांवर....

मुंबई : भारतातील अनेक महामार्गांवर टोल वसुली सुलभ करण्यासाठी फास्टॅग चा वापर केला जातो. इंधनाची बचत, वेळेची बचत, आणि पद्धतशीर टोलची वसुलीसुद्धा, याच टोलवसुलीमध्ये सुद्धा लोक जुगाड करून आपले पैसे वाचवत आहेत. वाहनचालक पैसे वाचवण्यासाठी फास्टॅग च्या स्कॅनर मध्ये जुगाड करत आहेत. सर्रासपणे चाललेली ही गोष्ट पटकन कोणाच्या लक्षात येण्यासारखी नसते त्यामुळे अनेक गैरप्रकार टोल वसुलीद्वारे केले जात आहेत.




अशी केली जाते गडबड


काचेवर स्कॅनर न चिटकवणे : अनेक वाहनांवर, काचेवर फास्टॅग बऱ्याचवेळी नसतो. तो हातात धरून किंवा प्लॅस्टिकमध्ये असतो, त्यामुळे टोल वसुली करणाऱ्यांना तो टॅग कोणत्या गाडीचा आहे यावर त्यांची चटकन नजर जात नाही.


दुसऱ्या गाडीचा टॅग वापरला जातो : कारसाठी असलेला फास्टॅग मोठ्या वाहनांवर म्हणेजच ट्रक किंवा बस वर चिटकवून कमी टोल भरण्याचा प्रयत्न केला जातो.


फास्टॅग झाकून ठेवला जातो : कॅमेऱ्या टॅग स्कॅन करू शकणार नाही अशा पद्धतीने टॅगवर सेलोटेप किंवा इतर काहीतरी लावले जाते, जेणेकरून तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन कमी तोल भरण्याचा प्रयत्न केला जातो.




'नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया' ने फास्टॅग चे नियम केले कडक


टोल वसुली चुकवणाऱ्यांना किंवा काही कारण सांगून टोल कमी करायला लावणार असल्यास त्यांना आता दुप्पट दंड ठोठावण्याचा कायदा नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया ने केला आहे. जर फास्टॅग स्कॅन झाला नाही किंवा त्यात काही फेरफार आढळला तर नियमानुसार चालकाला दुप्पट तोल भरावा लागू शकतो. आणि असे वारंवार घडल्यास तुमचा फास्टॅग हा कायमचा बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे योग्य टोल भरणं आणि फास्टॅगची व्यवस्थित काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे

Comments
Add Comment

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Moshi Incident : मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर; १७ जणांना बाहेर काढण्यात यश

पिंपरी  : मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा सहावर

Donald Trump : हजार क्षेपणास्त्रे तयार;इराणला ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

Ashish Shelar : लोककलांच्या धोरणाच्या बळकटीकरणासाठी समिती स्थापन करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार झाले आहे, त्यामध्ये लोककलांचा विचार