Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना गावांच्या विकासाला हातभार लावत असून समृद्ध गाव बनवण्याच्या दिशेने गावांची वाटचाल होत आहे. स्वछ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक गावांनी आपली गावे स्वछ करून शासनाचे पुरस्कार पटकावले आहेत.


त्यातच आता चर्चा आहे महाराष्ट्रातील अशा गावाची ज्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच जनावरांसाठी ब्युटी पार्लर उभारले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे या गावाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.




या गावात आहे महाराष्ट्रातील 'जनावरांचे पहिले ब्युटी पार्लर'


सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रसिद्ध असलेली मान्याची वाडी एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जात. या गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळाला आहे. आणि याच गावाने आता जनावरांसाठी ब्युटी पार्लर उघडलं आहे.




प्रदूषण रोखण्यासाठीचा उपाय म्हणून...


 गावातील जनावरे नदी ओढ्यांमध्ये अंघोळीला जातात, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. यावर उपाय म्हणून एका जनावरांचे ब्युटी पार्लर ही संकल्पना तयार केली गेली. जनावरांच्या अंघोळीसाठी शॉवर पद्धत यात वापरली असून अंघोळीचे पाणी प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरलं जात, जनावरांनाही स्वच्छ ठिकाणी अंघोळ केल्याने जनावरांचा आरोग्य सुधारत पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रकल्पाला स्थानिक प्रशासनासह पर्यावरण प्रेमींकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

एका बाजूला महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर

Satara Accident : नवा संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक ५० फूट दरीत कोसळून चिमुकल्यासह चौघांचा करुण अंत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कासरतळे (Kaasratale) परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची नोंद झाली आहे. येथे

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान