Bihar CM Samrat Choudhary: बिहारच्या नवीन राजकीय पर्वाची सुरुवात; सम्राट चौधरी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडत सम्राट चौधरी (Bihar CM Samrat Choudhary) यांनी राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सय्यद अता हसनैन यांनी पाटणा येथील लोक भवनात त्यांना शपथ दिली. त्यांच्या नियुक्तीमुळे बिहारमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे.


सम्राट चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री ठरले असून एनडीए सरकारमध्ये जेडीयू कोट्यातून विजय चौधरी आणि विजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.



साध्या कुटुंबातून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास :


१६ नोव्हेंबर १९६८ रोजी मुंगेर जिल्ह्यात जन्मलेल्या सम्राट चौधरी यांचा राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबातूनच आला. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे देखील राजकारणात सक्रिय होते. शिक्षणानंतर त्यांनी १९९० मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.



राजकारणातील मजबूत पायाभरणी :


सम्राट चौधरी यांनी १९९९ मध्ये राबडी देवी यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आपली ओळख मजबूत केली. २०१४ मध्ये जितन राम मांझी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केलं.



भाजपमधील वाढता प्रभाव :


२०१८ मध्ये त्यांची भाजपच्या बिहार उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि २०२३ मध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाले. ओबीसी चेहरा म्हणून त्यांनी राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका बजावली. या राजकीय प्रवासात सम्राट चौधरी अनेकदा वादातही सापडले. विधानसभेतील वाद, तसेच नितीश कुमार यांच्यावर केलेल्या टीकांमुळे ते सतत चर्चेत राहिले.



पुढील आव्हाने मोठी :


मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आता सम्राट चौधरी यांच्यासमोर राज्यातील विकास, सामाजिक समतोल आणि राजकीय स्थिरता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.


एकूणच, सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

2,000-Year-Old Indian Gold Rings : थायलंडमध्ये २००० वर्षे जुन्या भारतीय सोन्याच्या अंगठ्या सापडल्या; प्राचीन व्यापारी संबंधांचे पुरावे

बँकॉक: पश्चिम थायलंडमधील पेचबुरी प्रांतातील 'डॉन याई थोंग' (Don Yai Thong) या पुरातत्व स्थळावर सुरू असलेल्या उत्खननात

Ahilyanagar : भंडारदऱ्यात निसर्गाचा हाहाकार ! 24 तासांत 300 मिमी पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद

Ahilyanagar Rain : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचा तांडव पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्या, धरणे दुथडी भरून

Madhuri Misal : ग्लोबल हॉस्पिटलचा अतिरिक्त FSI परत घेण्याबाबत कायदेशीर चाचपणी; विधान परिषदेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे उत्तर!

- २० वर्षे गरीब रुग्णांना खाटा न दिल्याचा मुद्दा गाजला; २१ जुलैच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर शासन कडक पावले

नाशिक प्रशासन अलर्ट! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इगतपुरी दौरा; धरणे, पूल आणि धबधब्यांची पाहणी

नाशिक : भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि नाशिक ग्रामीण

Ahmedabad Blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय; ३८ दोषींची फाशी, ११ जणांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

Ahmedabad Blast : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Blast) प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत

Devendra Fadnavis : तपास न करताच वडील आणि भावावर हत्येचा गुन्हा, बेपत्ता मुलगी परतल्यानंतर पोलिसांचे बिंग फुटले

बुलढाण्यातील घटनेची विधानसभेत चर्चा; जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची