Bihar CM Samrat Choudhary: बिहारच्या नवीन राजकीय पर्वाची सुरुवात; सम्राट चौधरी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडत सम्राट चौधरी (Bihar CM Samrat Choudhary) यांनी राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सय्यद अता हसनैन यांनी पाटणा येथील लोक भवनात त्यांना शपथ दिली. त्यांच्या नियुक्तीमुळे बिहारमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे.


सम्राट चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री ठरले असून एनडीए सरकारमध्ये जेडीयू कोट्यातून विजय चौधरी आणि विजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.



साध्या कुटुंबातून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास :


१६ नोव्हेंबर १९६८ रोजी मुंगेर जिल्ह्यात जन्मलेल्या सम्राट चौधरी यांचा राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबातूनच आला. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे देखील राजकारणात सक्रिय होते. शिक्षणानंतर त्यांनी १९९० मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.



राजकारणातील मजबूत पायाभरणी :


सम्राट चौधरी यांनी १९९९ मध्ये राबडी देवी यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आपली ओळख मजबूत केली. २०१४ मध्ये जितन राम मांझी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केलं.



भाजपमधील वाढता प्रभाव :


२०१८ मध्ये त्यांची भाजपच्या बिहार उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि २०२३ मध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाले. ओबीसी चेहरा म्हणून त्यांनी राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका बजावली. या राजकीय प्रवासात सम्राट चौधरी अनेकदा वादातही सापडले. विधानसभेतील वाद, तसेच नितीश कुमार यांच्यावर केलेल्या टीकांमुळे ते सतत चर्चेत राहिले.



पुढील आव्हाने मोठी :


मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आता सम्राट चौधरी यांच्यासमोर राज्यातील विकास, सामाजिक समतोल आणि राजकीय स्थिरता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.


एकूणच, सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Wrestling : भारतीय मल्लांचे आशियाई कुस्तीत वर्चस्व, २७ पदकांसह पटकावले सांघिक विजेतेपद

नवी दिल्ली : व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय पुरुष

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Modi : मोदी सरकारने केलेल्या ३ सुधारणांमुळे ८० कोटी रेशनधारकांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला ८० कोटी लोकांना अन्नधान्याचा