West Bengal Assembly Election 2026 : ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या प्रमुखाला ईडीकडून अटक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई करत I-PAC (इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी) चे सहसंस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना दिल्लीतून अटक केली आहे. याच I-PAC च्या कोलकाता कार्यालयावर यंदाच्या जानेवारीत ईडीने (ED) छापेमारी केली होती, तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः तेथे पोहोचल्या होत्या.



कोण आहेत विनेश चंदेल ?


विनेश चंदेल हे I-PAC चे प्रमुख रणनीतीकार आहेत. प्रशांत किशोर, प्रतीक जैन आणि ऋषिराज सिंह यांच्यासह त्यांनी या राजकीय सल्लागार कंपनीची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) च्या निवडणूक प्रचाराचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.



मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक :


ईडीच्या माहितीनुसार, विनेश चंदेल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर PMLA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बहुचर्चित ‘कोळसा घोटाळ्या’शी संबंधित आहे. तपास यंत्रणेनुसार, कोळसा चोरी आणि तस्करीतून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा हवाला मार्गे I-PAC च्या खात्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता.



ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली :


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अटक झाल्याने ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. या अटकेमुळे बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याआधी २ एप्रिल रोजी ईडीने दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले होते. तसेच ८ जानेवारीला कोलकात्यातील I-PAC कार्यालय आणि प्रतीक जैन यांच्या निवासस्थानीही कारवाई करण्यात आली होती.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा