West Bengal Assembly Election 2026 : ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या प्रमुखाला ईडीकडून अटक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई करत I-PAC (इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी) चे सहसंस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना दिल्लीतून अटक केली आहे. याच I-PAC च्या कोलकाता कार्यालयावर यंदाच्या जानेवारीत ईडीने (ED) छापेमारी केली होती, तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः तेथे पोहोचल्या होत्या.



कोण आहेत विनेश चंदेल ?


विनेश चंदेल हे I-PAC चे प्रमुख रणनीतीकार आहेत. प्रशांत किशोर, प्रतीक जैन आणि ऋषिराज सिंह यांच्यासह त्यांनी या राजकीय सल्लागार कंपनीची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) च्या निवडणूक प्रचाराचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.



मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक :


ईडीच्या माहितीनुसार, विनेश चंदेल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर PMLA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बहुचर्चित ‘कोळसा घोटाळ्या’शी संबंधित आहे. तपास यंत्रणेनुसार, कोळसा चोरी आणि तस्करीतून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा हवाला मार्गे I-PAC च्या खात्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता.



ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली :


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अटक झाल्याने ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. या अटकेमुळे बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याआधी २ एप्रिल रोजी ईडीने दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले होते. तसेच ८ जानेवारीला कोलकात्यातील I-PAC कार्यालय आणि प्रतीक जैन यांच्या निवासस्थानीही कारवाई करण्यात आली होती.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती