मुंबई : राज्याच्या राजधानीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन खून झाल्याने मुंबई हादरली आहे. काही मोठ्या घटनांमुळे नाही तर छोट्या गोष्टींमुळे झालेल्या या घटनांमुळे माणसाचा राग किती टोकाला जाऊ शकतो, आणि त्या रागाच्या भरात माणूस जीवही घेऊ शकतो, हेच यातून स्पष्ट होते आहे. मुंबईतील दादर, माटुंगा, खेरवाडी परिसरात या घटना घडल्या असून संबंधित परिसरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ...
हत्येची कारणं
दादर : पत्नीसमोरच पतीचा केला खून
पूर्ववैमनस्यातून दादरमध्ये पत्नीसमोरच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार, अंकुश आंबेकर ( २८ ) या तरुणाचा गौरव सनस याच्याशी जुना वाद होता. एकूण सात जणांनी मिळून अकुंशला बेदम मारहाण केली. पत्नीने गौरवला केईएम रुग्णालयात नेले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
माटुंगा : पार्किंगच्या वादातून एकाची हत्या
Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार
पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित ...
">छोटासा वाद किती मोठं टोक गाठू शकतो हे या हत्येवरून कळत आहे. नरेश वाघेला ( ६५ ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, दादर टाटा येथील ब्रिजखाली वाहन उभे करू नये म्हणून तो समजावत होता. त्यावेळी साहिल घाडगे आणि शाहबाज मो. रफिक शेख यांच्याशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. वाघेला यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सविता देखील होत्या, अचानक दोन्ही आरोपींना वाघेला यांना मारहाण केली आणि पळ काढला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार
पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित ...
खेरवाडीत कल्पतरू स्पार्कल्स येथे ही घटना घडली असून, दोन अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात अभिनव चौधरी या इसमाची हत्या झाली आहे. सलग तीन हत्यांमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, काही आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत, मुंबई पोलीस या प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.