Samrat Choudhary : भाजपचे सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री, घोषणेआधी काय घडलं ? जाणून घ्या सगळं

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व केल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार म्हणून काम करणार आहेत. एनडीएतील एक महत्त्वाचे नेत म्हणून ते दिल्लीत मोठी भूमिका बजावण्याची शक्यता आहे. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीएतील अंतर्गत सामंजस्यानुसार बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने नव्या मुख्यमंत्र्यांची नावाची घोषणा केली आहे. नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या सम्राट चौधरींची एकमताने बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाली आहे. नितीश कुमार यांनी सम्राट यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारला पाठिंबा दिल्याचे तसेच दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून काम करताना बिहारच्या विकासाला गती देण्यासाठी शक्य ते ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.



बिहारमध्ये एकविसाव्या शतकातही जातीपातींच्या राजकारणाला प्रचंड महत्त्व आहे. सम्राट चौधरी हे कुशवाह (कोईरी) या ओबीसींमध्ये समाविष्ट असलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची मूळं बिहारमध्ये आणखी मजबूत होतील, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे होते, त्यामुळे सम्राट चौधरींना मुख्यमंत्री करून भाजपने 'लव-कुश समीकरण' साधले आहे. बिहारच्या राजकारणात कुर्मी आणि कोईरींमधील राजकीय सामंजस्याला 'लव-कुश समीकरण' म्हणतात. हे समीकरण साधून भाजपच्या नेतृत्वात एनडीएने स्वतःची मतपेढी अर्थात व्होटबँक आणखी मजबूत केली असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.



सम्राट चौधरी हे २०२३ मध्ये बिहार भाजपचे अध्यक्ष झाले. नंतर बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्व सम्राट यांनीच केले. नितीश सरकारमध्ये ते भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. आता ते बिहारचे मुख्यमंत्री होत आहेत. सम्राट चौधरी बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. राज्यपाल सम्राट यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

SRHvsPBKS : क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा भोवला, पंजाब किंग्सचा पराभव; सनरायझर्स हैदराबादचा विजय

कूपर कॉनलीची एकाकी शतकी झुंज पंजाबने हैदराबादला अव्वल स्थान केले बहाल हैदराबाद : २२०+ धावा उभारल्यानंतर विजय

BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून

Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच

जगातल्या पहिल्या २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनीचे CNN चे संस्थापक Ted Turner यांचे निधन

अटलांटा : टेड टर्नर यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते सीएनएन या जगातल्या पहिल्या २४ तास बातम्या देणाऱ्या

CM Student Science Wari : 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता

मुंबई : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

Gymkhana : राज्यातील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याबाबत लवकरच नवीन धोरण

मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनींवर उभारण्यात आलेल्या जिमखान्यांचे भाडेपट्टे संपुष्टात