Samrat Choudhary : भाजपचे सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री, घोषणेआधी काय घडलं ? जाणून घ्या सगळं

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व केल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार म्हणून काम करणार आहेत. एनडीएतील एक महत्त्वाचे नेत म्हणून ते दिल्लीत मोठी भूमिका बजावण्याची शक्यता आहे. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीएतील अंतर्गत सामंजस्यानुसार बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने नव्या मुख्यमंत्र्यांची नावाची घोषणा केली आहे. नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या सम्राट चौधरींची एकमताने बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाली आहे. नितीश कुमार यांनी सम्राट यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारला पाठिंबा दिल्याचे तसेच दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून काम करताना बिहारच्या विकासाला गती देण्यासाठी शक्य ते ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.



बिहारमध्ये एकविसाव्या शतकातही जातीपातींच्या राजकारणाला प्रचंड महत्त्व आहे. सम्राट चौधरी हे कुशवाह (कोईरी) या ओबीसींमध्ये समाविष्ट असलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची मूळं बिहारमध्ये आणखी मजबूत होतील, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे होते, त्यामुळे सम्राट चौधरींना मुख्यमंत्री करून भाजपने 'लव-कुश समीकरण' साधले आहे. बिहारच्या राजकारणात कुर्मी आणि कोईरींमधील राजकीय सामंजस्याला 'लव-कुश समीकरण' म्हणतात. हे समीकरण साधून भाजपच्या नेतृत्वात एनडीएने स्वतःची मतपेढी अर्थात व्होटबँक आणखी मजबूत केली असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.



सम्राट चौधरी हे २०२३ मध्ये बिहार भाजपचे अध्यक्ष झाले. नंतर बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्व सम्राट यांनीच केले. नितीश सरकारमध्ये ते भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. आता ते बिहारचे मुख्यमंत्री होत आहेत. सम्राट चौधरी बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. राज्यपाल सम्राट यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Neral Housing Scam : नेरळमध्ये 93 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप

रायगड : कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील मोहाची वाडी, शनी मंदिर शेजारील ग्रामपंचायत हद्दीत जमीन व्यवहार आणि

SOP For Heat wave : उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून एसओपी जारी

मुंबई : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या

Women's Reservation Bill : सुधारित महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर होणार, काय असेल यात तपशील उघड

नवी दिल्ली : महिलांना लवकरच संसद आणि विधीमंडळात ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. या विधेयकाचा सुधारित मसुदा

Ashok Kharat, Rupali Chakankar : खरात प्रकरणात माझ्या बदनामीचा डाव - रुपाली चाकणकर

मुंबई : "गेल्या २८ दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होणारे सर्व आरोप हे केवळ हेतूपुरस्सर आणि बदनामी

Accident News : मध्यधुंद कारचालक आणि तीन जीवांचा निष्पाप बळी; कुटुंब झालं उध्वस्त

कोल्हापूर : हातकणंगल्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत उदय अशोक जाधव (34) आणि त्यांचा पाच

Jyotiba Temple Development Plan : जोतिबा मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याला ‘सुप्रमा’

२५२ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा; ऐतिहासिक वारसा जपत पायाभूत सुविधांचे जाळे तयार करणार मुंबई : दख्खनचा राजा