Nitish Kumar : नितीशपर्व संपले, बिहारला मिळणार नवा मुख्यमंत्री

पाटणा : राज्यसभा खासदार आणि जेडीयूचे सर्वोच्च नेते नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. पाटणा येथे लोकभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन नितीश यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. आता नितीशकुमार राज्यसभा खासदार म्हणून काम करतील. ते एनडीए अर्थात रालोआमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचीही शक्यता आहे. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले. भावनांनी ओथंबलेल्या या पत्रातून बिहारसाठी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचा थोडक्यात लेखाजोखा नितीश यांनी मांडला आहे.


नितीश यांनी पहिल्यांदा २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. राज्यात पहिल्यांदाच एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. नितीश यांनी सत्तेत आल्यापासून बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करण्यावर भर दिला. समाजातील मागासवर्गीयांच्या भल्यासाठी काम केले. बिहारमध्ये सुशासन निर्मितीवर भर दिला. राज्याच्या विकासाला चालना दिली. दलित, महादलित अशा सर्वांसाठी काम केले. हिंदू, मुसलमान, सवर्ण, मागासवर्गीय असा भेद न करता सर्वांच्या कल्याणासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शेती, महिला व बालकल्याण, युवा यांच्या भल्यासाठी काम करण्यावर भर दिला.


आता राज्यसभेचा सदस्य असलो तरी बिहारच्या कल्याणासाठी शक्य ते ते काम करणार असल्याचे नितीश यांनी जनतेला आश्वासन दिले आहे. एनडीएने बिहारच्या विकासाकरिता २०३० पर्यंतचा कार्यक्रम तयार केला आहे. या कामाला गती मिळावी यासाठी दिल्लीतून आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे नितीश यांनी जाहीर केले आहे. देशातील अव्वल राज्यांमध्ये बिहारचा समावेश व्हावा यासाठी काम करणार असल्याचे नितीश यांनी जनतेला वचन दिले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बिहारसाठी काम करणाऱ्या सरकारला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचेही नितीश यांनी पत्रातून जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

SRHvsPBKS : क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा भोवला, पंजाब किंग्सचा पराभव; सनरायझर्स हैदराबादचा विजय

कूपर कॉनलीची एकाकी शतकी झुंज पंजाबने हैदराबादला अव्वल स्थान केले बहाल हैदराबाद : २२०+ धावा उभारल्यानंतर विजय

BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून

Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच

जगातल्या पहिल्या २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनीचे CNN चे संस्थापक Ted Turner यांचे निधन

अटलांटा : टेड टर्नर यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते सीएनएन या जगातल्या पहिल्या २४ तास बातम्या देणाऱ्या

CM Student Science Wari : 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता

मुंबई : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

Gymkhana : राज्यातील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याबाबत लवकरच नवीन धोरण

मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनींवर उभारण्यात आलेल्या जिमखान्यांचे भाडेपट्टे संपुष्टात