Bihar : बिहारमध्ये बुधवारी सकाळी तीन नेतेच घेणार शपथ

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार आणि एनडीएचे एक महत्त्वाचे नेते म्हणून दिल्लीत काम करणार आहेत. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीएतील अंतर्गत सामंजस्यानुसार बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने नव्या मुख्यमंत्र्यांची नावाची घोषणा केली आहे. नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या सम्राट चौधरींची एकमताने बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाली आहे. नितीश कुमार यांनी सम्राट यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारला पाठिंबा दिल्याचे तसेच दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून काम करताना बिहारच्या विकासाला गती देण्यासाठी शक्य ते ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी भाजपचे सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. या व्यतिरिक्त जेडीयू अर्थात जनता दल युनायटेडचे ज्येष्ठ नेते बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय कुमार चौधरी हे दोघे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सध्या या तीन शपथविधींचा कार्यक्रम निश्चित आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर सम्राट चौधरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, जेडीयू, लोजपा - रामविलास पासवान गट, जितन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा यांच्या निवडक नेत्यांचा समावेश केला जाईल.



पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडू आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकांचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल येण्याआधीच बिहारमध्ये सम्राट चौधरी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे नियोजन करत आहेत. विधानसभांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निश्चित केला जाणार असल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment

SRHvsPBKS : क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा भोवला, पंजाब किंग्सचा पराभव; सनरायझर्स हैदराबादचा विजय

कूपर कॉनलीची एकाकी शतकी झुंज पंजाबने हैदराबादला अव्वल स्थान केले बहाल हैदराबाद : २२०+ धावा उभारल्यानंतर विजय

BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून

Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच

जगातल्या पहिल्या २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनीचे CNN चे संस्थापक Ted Turner यांचे निधन

अटलांटा : टेड टर्नर यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते सीएनएन या जगातल्या पहिल्या २४ तास बातम्या देणाऱ्या

CM Student Science Wari : 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता

मुंबई : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

Gymkhana : राज्यातील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याबाबत लवकरच नवीन धोरण

मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनींवर उभारण्यात आलेल्या जिमखान्यांचे भाडेपट्टे संपुष्टात