Asha Bhosle : आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील कारर्कीद, पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरव

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी त्यांचं दुःखद निधन झालं.


आशाताईंच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची गाणी अजरामर आहेत, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आशा भोसलेंना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार देऊन गौरविले आहे.


राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका) या पुरस्कारानेही आशा भोसलेंचा सन्मान करण्यात आला होता. १९८१ आणि १९८६ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला. याबरोबरच आशा भोसले यांना फिल्मफेयर पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका) म्हणून देखील गौरविण्यात आलं आहे.


आशा भोसलेंना १९९६ मध्ये  जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचंड गाजलेल्या “रंगीला” सिनेमासाठीही स्पेशल फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता.


तसेच, २००० मध्ये सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारने आशा भोसलेंचा गौरव करण्यात आला. यानंतर २००१ मध्ये फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.



आशा भोसले यांना २००२ मध्ये “लगान” सिनेमातील “राधा कैसे न जले” या गाण्यासाठी IIFA Awards (सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका) या पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होत. तसेच, नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड १९८७ नेही त्यांचा सन्मान करण्यात आला. सिंगर ऑफ द मिलेनियम २०००(दुबई) आणि BBC लाइफटाइम अ‍ॅचिव्हमेंट अवॉर्डनेही आशाताईंचा २००२ मध्ये गौरव करण्यात आला होता.


आशा भोसले यांना भारत सरकारकडून २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. तर, महाराष्ट्र सरकारनं २४ मार्च २०२३ रोजी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशा भोसलेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी