Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पासाठी आता नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रोचे काम येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तांत्रिक चाचण्या आणि सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर, जानेवारी २०२७ मध्ये ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या मेट्रोमुळे ठाणे आणि भिवंडीतील प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.



दहिसर-काशीगाव मेट्रोनंतर आता ठाणे-भिवंडी मेट्रोची प्रतीक्षा


नुकत्याच सुरू झालेल्या दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांनी डोक्यावर घेतले असून, स्थानकांवर लागणाऱ्या रांगांवरून ठाणेकरांची मेट्रोची ओढ स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गेली अनेक वर्षे रखडलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रोची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. सध्या या मार्गावर प्रवाशांना अनियमित बस सेवा आणि वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास दिवा स्थानकावरून मोजक्याच 'मेमू' गाड्या उपलब्ध असल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे ठाणे-भिवंडी मेट्रो मार्ग तातडीने सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना तासाभराच्या कोंडीतून आणि बसच्या विलंबातून मोठी मुक्ती मिळणार आहे.


मार्ग कसा असणार ?


ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडणाऱ्या २५ किमी लांबीच्या मेट्रो ५ (ऑरेंज लाईन) प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडी दरम्यानचे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. सध्या भिवंडीतून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना ठाणे किंवा कल्याणमार्गे बसने प्रवास करावा लागतं. मात्र, मेट्रो सुरू होताच हा त्रास कायमचा संपणार आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. या पाहणीनंतर, तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ठाणे आणि भिवंडी दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.
Comments
Add Comment

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

NEET Students Protest : नीट विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चेचे गृहमंत्री अमित शहा यांचे आव्हान

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या

PM Narendra Modi : शॉर्टकटचा मोह टाळा, मेहनत आणि संघर्षाचा मार्ग निवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेन-झी पिढीला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली : सोशल मीडिया, रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या आधुनिक युगात तरुणांनी क्षणिक यशाच्या मागे न धावता

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे

Piyush Goyal : नऊ मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योग, व्यवसायांना मिळाली चालना

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपतींनी आणि नागरिकांनी भारतीय उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेत नेताना उचित व्यापार