Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पासाठी आता नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रोचे काम येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तांत्रिक चाचण्या आणि सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर, जानेवारी २०२७ मध्ये ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या मेट्रोमुळे ठाणे आणि भिवंडीतील प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.



दहिसर-काशीगाव मेट्रोनंतर आता ठाणे-भिवंडी मेट्रोची प्रतीक्षा


नुकत्याच सुरू झालेल्या दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांनी डोक्यावर घेतले असून, स्थानकांवर लागणाऱ्या रांगांवरून ठाणेकरांची मेट्रोची ओढ स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गेली अनेक वर्षे रखडलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रोची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. सध्या या मार्गावर प्रवाशांना अनियमित बस सेवा आणि वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास दिवा स्थानकावरून मोजक्याच 'मेमू' गाड्या उपलब्ध असल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे ठाणे-भिवंडी मेट्रो मार्ग तातडीने सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना तासाभराच्या कोंडीतून आणि बसच्या विलंबातून मोठी मुक्ती मिळणार आहे.


मार्ग कसा असणार ?


ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडणाऱ्या २५ किमी लांबीच्या मेट्रो ५ (ऑरेंज लाईन) प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडी दरम्यानचे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. सध्या भिवंडीतून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना ठाणे किंवा कल्याणमार्गे बसने प्रवास करावा लागतं. मात्र, मेट्रो सुरू होताच हा त्रास कायमचा संपणार आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. या पाहणीनंतर, तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ठाणे आणि भिवंडी दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde : गावदेवी मार्केट आग, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

ठाणे : शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका

Egg Donation Case : तब्बल ३७ वेळा स्त्री बीज दान, बदलापूर प्रकरणी ५ हजार पानांचे आरोपपत्र ; १५ जणांवर गुन्हा

उल्हासनगर  : बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदा स्त्री बीज दान प्रकरणाच्या तपासादरम्यान एका महिलेने तब्बल ३७

Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनी चौक परिसरात गुरुवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ

UPSC च्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) वर्ष २०२७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

USA Invest In India : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार अमेरिका

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामध्ये आगामी काळात "मोठ्या घडामोडी" घडणार असल्याचे