'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका


मुंबई : निवडणुकांमधील सलग पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षात उफाळलेली तीव्र नाराजी यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी ‘उबाठा’ गटाचे नेतेच खासदार फुटीच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे काहीही नसून, आपल्याच खासदारांना बदनाम करण्यासाठी ही केविलवाणी धडपड सुरू आहे, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठाच्या खासदारांमध्ये ठाण्यात गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताचा म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दांत निषेध केला. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


खासदार म्हस्के म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे खासदार एकमेकांच्या संपर्कात असणे, एकत्र जेवणे ही आपली राजकीय संस्कृती आहे. मात्र, अशा संवादाचा अर्थ ‘पक्ष फूट’ असा लावणे पूर्णतः चुकीचे आहे. माध्यमांत फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत.”



उबाठा अंतर्गत बंडाळीने अस्वस्थ


उबाठा गटाचे नेतृत्व सध्या अंतर्गत बंडाळीने ग्रासले असल्याचा दावा करत म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “उबाठाच्या नेत्यांचा स्वतःच्या खासदारांवर विश्वास राहिलेला नाही. खासदारांना बदनाम करण्यासाठी संजय राऊत हेच अशा बातम्या पेरण्याचे कारस्थान करत आहेत. राऊतांच्या अशाच कार्यपद्धतीमुळे हा पक्ष आज मृतावस्थेत गेला आहे,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.



पक्षांतर्गत शीतयुद्ध


यावेळी म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात ‘शीतयुद्ध’ सुरू असल्याचा दावा केला. “आदित्य ठाकरे हे राऊतांना जाब विचारत असून राऊतांची पक्षातच अवस्था बिकट झाली आहे. दुसरीकडे, अरविंद सावंत यांना त्यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच टार्गेट करत आहेत. त्यांना वारंवार स्वतःच्या निष्ठेची अग्निपरिक्षा द्यावी लागते, यावरूनच उबाठा गटात काय चालले आहे हे स्पष्ट होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

MPSC Nipun Setu : एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना 'निपुण सेतू'द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम

Devendra Fadnavis : नीट' परीक्षेच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) रद्द केलेली

Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. लहानपणापासून एकचं

Crime News : रात्री वडिलांनी चापट मारली, घरात सकाळी भयानक दृश्य समोर आलं, मॅकेनिकल इंजिनिअर मुलाचं वडिलांसोबत भयंकर कृत्य

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाला जास्त जीव लावला जातो, हा राग मनात

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोनवडी येथील

Transport Minister Pratap Sarnaik : एसटीची स्थानके आणि बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; जागतिक पर्यावरण दिनी राज्यव्यापी आधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मुंबई :