'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका


मुंबई : निवडणुकांमधील सलग पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षात उफाळलेली तीव्र नाराजी यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी ‘उबाठा’ गटाचे नेतेच खासदार फुटीच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे काहीही नसून, आपल्याच खासदारांना बदनाम करण्यासाठी ही केविलवाणी धडपड सुरू आहे, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठाच्या खासदारांमध्ये ठाण्यात गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताचा म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दांत निषेध केला. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


खासदार म्हस्के म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे खासदार एकमेकांच्या संपर्कात असणे, एकत्र जेवणे ही आपली राजकीय संस्कृती आहे. मात्र, अशा संवादाचा अर्थ ‘पक्ष फूट’ असा लावणे पूर्णतः चुकीचे आहे. माध्यमांत फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत.”



उबाठा अंतर्गत बंडाळीने अस्वस्थ


उबाठा गटाचे नेतृत्व सध्या अंतर्गत बंडाळीने ग्रासले असल्याचा दावा करत म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “उबाठाच्या नेत्यांचा स्वतःच्या खासदारांवर विश्वास राहिलेला नाही. खासदारांना बदनाम करण्यासाठी संजय राऊत हेच अशा बातम्या पेरण्याचे कारस्थान करत आहेत. राऊतांच्या अशाच कार्यपद्धतीमुळे हा पक्ष आज मृतावस्थेत गेला आहे,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.



पक्षांतर्गत शीतयुद्ध


यावेळी म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात ‘शीतयुद्ध’ सुरू असल्याचा दावा केला. “आदित्य ठाकरे हे राऊतांना जाब विचारत असून राऊतांची पक्षातच अवस्था बिकट झाली आहे. दुसरीकडे, अरविंद सावंत यांना त्यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच टार्गेट करत आहेत. त्यांना वारंवार स्वतःच्या निष्ठेची अग्निपरिक्षा द्यावी लागते, यावरूनच उबाठा गटात काय चालले आहे हे स्पष्ट होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 45 हजार नावं शिधापत्रिकेच्या यादीतून हटवली, तुमचंही नाव यादीत तर नाही ना ?

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून

नाशिक : विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने ३५ कोटींची वर्कआॅर्डर, कुंभमेळा कामांत मोठा घोटाळा समोर

नाशिक - नाशिक व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यानिमित्त विविध विकासकामे वेगात सुरू असताना, चक्क

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला थेट...

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन

US And Iran War : पाकिस्तानने अमेरिकेच्या नाकेबंदी दरम्यान इराणसाठी सहा भूमार्ग केले खुले

वॉशिंग्टन : पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावत