'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका


मुंबई : निवडणुकांमधील सलग पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षात उफाळलेली तीव्र नाराजी यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी ‘उबाठा’ गटाचे नेतेच खासदार फुटीच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे काहीही नसून, आपल्याच खासदारांना बदनाम करण्यासाठी ही केविलवाणी धडपड सुरू आहे, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठाच्या खासदारांमध्ये ठाण्यात गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताचा म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दांत निषेध केला. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


खासदार म्हस्के म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे खासदार एकमेकांच्या संपर्कात असणे, एकत्र जेवणे ही आपली राजकीय संस्कृती आहे. मात्र, अशा संवादाचा अर्थ ‘पक्ष फूट’ असा लावणे पूर्णतः चुकीचे आहे. माध्यमांत फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत.”



उबाठा अंतर्गत बंडाळीने अस्वस्थ


उबाठा गटाचे नेतृत्व सध्या अंतर्गत बंडाळीने ग्रासले असल्याचा दावा करत म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “उबाठाच्या नेत्यांचा स्वतःच्या खासदारांवर विश्वास राहिलेला नाही. खासदारांना बदनाम करण्यासाठी संजय राऊत हेच अशा बातम्या पेरण्याचे कारस्थान करत आहेत. राऊतांच्या अशाच कार्यपद्धतीमुळे हा पक्ष आज मृतावस्थेत गेला आहे,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.



पक्षांतर्गत शीतयुद्ध


यावेळी म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात ‘शीतयुद्ध’ सुरू असल्याचा दावा केला. “आदित्य ठाकरे हे राऊतांना जाब विचारत असून राऊतांची पक्षातच अवस्था बिकट झाली आहे. दुसरीकडे, अरविंद सावंत यांना त्यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच टार्गेट करत आहेत. त्यांना वारंवार स्वतःच्या निष्ठेची अग्निपरिक्षा द्यावी लागते, यावरूनच उबाठा गटात काय चालले आहे हे स्पष्ट होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

- तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिलेल्या आदेशांवर विरोधकांनी घेतला आक्षेप मुंबई : पुण्यातील तरुण व्यावसायिक