Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली. चोरी करून पळणाऱ्या आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी थेट तलावात उडी घेतली आणि तब्बल पाच तास पाण्यात लपून बसल्याची घटना समोर आली आहे.



तलावात लपण्याचा अनोखा प्रयत्न


जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. एका महिला प्रवाशाची पर्स चोरल्यानंतर हरविंदर सिंग (वय 32) याने पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू झाल्याचे लक्षात येताच त्याने जवळच्या तलावात उडी घेतली. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने कमळाच्या पोकळ देठाचा वापर करून श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याखाली लपून राहिला.



पाच तास चालले शोधमोहीम


6 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर RPF ने स्थानिक पोलिस आणि डायव्हर्सच्या मदतीने शोधमोहीम सुरू ठेवली. आरोपी तब्बल पाच तास पाण्यात लपून बसला होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला शोधून शोधण्यात यश मिळवले.


पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि जुन्या नोंदींचा आधार घेत तपास केला. ICJS प्रणालीद्वारे तपास करताच तो उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील सराईत गुन्हेगार हरविंदर सिंग असल्याचे स्पष्ट झाले.



अनेक राज्यांत गुन्ह्यांची नोंद


या आरोपीविरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो प्रामुख्याने रेल्वेत विनातिकीट प्रवास करून महिला आणि वृद्ध प्रवाशांना लक्ष्य करत असे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वारंवार सिम कार्ड बदलत असल्याची माहितीही समोर आली आहे.


इगतपुरी, भोपाळ, इटारसी आणि विशाखापट्टणम येथील रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आधीच वॉरंट जारी केले होते. त्यामुळे तो दीर्घकाळापासून पोलिसांच्या रडारवर होता. अखेर जबलपूर RPF ने त्याला ताब्यात घेतले आहे.


पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने केलेला हा अनोखा प्रयत्न चर्चेचा विषय ठरला असला, तरी अखेरीस पोलिसांच्या कारवाईसमोर त्याचा डाव फसला आणि सराईत गुन्हेगार जाळ्यात अडकला.

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह