ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. आता तिथे जाण्यासाठी सरकारी सुविधांचा वापर म्हणजे ST, रेल्वे यांचा वापर केला जाणारच. पण ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीवेळीच राज्य परिवहन मंडळाने ST भाडे वाढवले आहे.



भाडेवाढीमागील कारणे


उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ग्रामीण भागात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ST सेवेला मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार ST महामंडळाला असून, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.



किती टक्के वाढ?


राज्य परिवहन प्राधिकरणाने ST महामंडळाला सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. ही वाढ १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे.



स्वच्छता अधिभाराची अंमलबजावणी


ST स्थानके, बसगाड्या आणि आगार स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.


सवलतधारक आणि पासधारकांसाठीही अधिभार लागू
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांनाही हा स्वच्छता अधिभार लागू असेल. त्यामुळे सर्व प्रवाशांवर या वाढीचा परिणाम होणार आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांच्या पासवर ५ रुपये अधिभार आकारला जाणार आहे. मात्र आगाऊ आरक्षणातून घेतलेल्या पासवर हा अधिभार लागू नसेल. तसेच बस भाड्याने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे.



प्रमुख मार्गांवरील नवे दर


भाडेवाढीनंतर काही महत्त्वाच्या मार्गांवरील तिकिट दर पुढीलप्रमाणे असतील:


परळ ते कोल्हापूर - ६४० ऐवजी आता ७०४ रुपये
मुंबई ते कोल्हापूर - ७५० ऐवजी आता ८२५ रुपये
मुंबई ते लातूर - ९०० ऐवजी १००० रुपये
मुंबई ते रत्नागिरी - ६०० ऐवजी ७०० रुपये तिकीट दर असणार आहे.
मुंबई ते पुणे - २८२ ऐवजी ३१४ तिकीट दर
मुंबई ते नाशिक - ३२३ ते ३५९ रुपये
मुंबई ते अलिबाग - १८२ ऐवजी २०४ रुपये
मुंबई ते चिपळूण - ४५३ ऐवजी ५०२ रुपये


ही भाडेवाढ साधी बस, मिडी बस, जलद सेवा आणि रात्रसेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू असेल. मात्र शिवनेरी, शिवशाही, जनशिवनेरी, हिरकणी, शयनयान आणि ई-बस सेवांना या वाढीतून वगळण्यात आले आहे.


एकूणच, उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता ST ने हा निर्णय घेतला असला, तरी या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

Comments
Add Comment

Missing Link : 'सेल्फी' साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी

Rajasthan Royals : मित्तल कुटुंबीयाने आदर पूनावालांसह राजस्थान रॉयल्स संघ १५,६६० कोटी रुपयांना घेतला विकत

मुंबई : राजस्थान रॉयल्सला नवीन मालक मिळाले आहेत. स्टील किंग लक्ष्मी मित्तल आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे

Kapil Sharma Cafe : कपिल शर्माच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’जवळ पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी

मुंबई : एकदा पुन्हा कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील रेस्टॉरंट ‘कॅप्स कॅफे’ जवळ गोळीबार झाल्याची घटना समोर

Metro Line 4 : मुंबई मेट्रो लाईन ४ अपघातांबाबतचे चौकशी अहवाल सार्वजनिक करा - मुलुंड भाजप आमदार मिहिर कोटेचा

आमदार मिहिर कोटेचा यांचे एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र मुलुंडमधील प्रकल्पात वारंवार सुरक्षा

Women's T20 World Cup : मुंबई महिला लीगचे पहिल्यांदाच आयोजन; इरा जाधव सर्वात महागडी क्रिकेटपटू

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामादरम्यान टी२० मुंबई लीगचा लिलाव पार पडला. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच, फ्रँचायझींनी महिला

Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू