Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती


मुंबई : कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आणि कागलचे मातब्बर नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या घाटगे यांनी बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे टोकाचे वैर आता संपले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आम्ही आता एकत्र काम करणार असल्याचे घाटगे यांनी यावेळी स्पष्ट केले.


नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे कोल्हापूरमधील पदाधिकारी आणि घाटगे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, "कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आतापर्यंत अनेक राजकीय प्रयोग झाले, पण आता प्रयोगांना स्कोप नाही. आपण आपल्या मूळ पक्षात परतलो आहोत. आता चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात जोमाने काम करायचे आहे. पक्षात सन्मानाने पुन्हा संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आभार".



मुश्रीफ-घाटगे संघर्ष मिटला


कागलमध्ये गेली अनेक वर्षे हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना घाटगे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. "हसन मुश्रीफ आणि माझ्यातील वैर आता संपले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते सर्वांनी पाहिलेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा संघर्ष संपवला असून, आगामी काळात आमचे उत्तम समन्वय जिल्ह्यात दिसेल," असे त्यांनी स्पष्ट केले.



शरद पवारांना कल्पना देऊनच निर्णय


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सोडण्यापूर्वी आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे घाटगे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यातच मी शरद पवार यांची भेट घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना कल्पना देऊनच मी हा पुढचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले.



घाटगे यांचा राजकीय प्रवास


२०१५ : भाजपमधून सक्रिय राजकारणात प्रवेश.
२०१८ : भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी.
२०१९ :उमेदवारी न मिळाल्याने मुश्रीफांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली, मात्र पराभव.
२०२४ : महायुतीत कागलची जागा मुश्रीफांकडे गेल्याने शरद पवारांच्या पक्षात प्रवेश; विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव.
२०२५ : स्थानिक निवडणुकांमध्ये मुश्रीफांशी जुळवून घेत युती.
८ एप्रिल २०२६ : पुन्हा अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश.

Comments
Add Comment

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५