अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू


मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.


ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते.


जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यु आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे ३६ जनावरांचाही मृत्यु झाला आहे.


एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.



१०५ टीएमसी पाणीसाठा तयार


दरम्यान, जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली.

Comments
Add Comment

नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता, 4 वाहतूक बेट, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्रास मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुंबई, दि.४ :

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : महामार्ग प्राधिमंत्री नितेश राणे यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगितीकरणाच्या अभियंत्यावर

नाशिक : सार्वजनिक रस्त्यावर लग्नसमारंभात वाहतूक कोंडी; 'या' नगरसेविकेसह एकावर गुन्हा दाखल

नाशिक : कामटवाडे परिसरात लग्नसमारंभादरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करून वाहतुकीत कोंडी

Mumbai : मुंबईत ड्युटी करणाऱ्या हवालदाराने टिटवाळ्यात केली आत्महत्या

Police Sucide News : मुंबईतील यलो गेट पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भाऊराव दगडू ढगे या ४२ वर्षीय पोलिसाने

भीषण अपघात ! मुक्ताईनगरमध्ये आयशरच्या धडकेत दाम्पत्य ठार, एक वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात आज सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य

भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द, महत्त्वाचे कारण समोर

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या थेट निवडून आलेल्या