New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात मोठे बदल केले आहेत. नव्या नियोजनानुसार महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले असून, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन सीमावर्ती तालुक्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येकी पाच अशा एकूण १० गावांचा समावेश या महामार्गात करण्यात आला आहे.


धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या या महामार्गाचा मूळ आराखडा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाच्या विरोधामुळे वादात सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने तांत्रिक फेरबदल करून स्थानिकांचा विरोध कमी करण्यासाठी नवीन मार्ग निश्चित केला आहे. नव्या आराखड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्गमधील सीमावर्ती गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



नव्याने समाविष्ट झालेली नवीन गावे


सावंतवाडी तालुका : केगद (चौकुळ), डेगवे, बांदा, पडवे आणि माजगाव.


दोडामार्ग तालुका : कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे.



२१ धार्मिक स्थळांना जोडणार


- शक्तीपीठ महामार्ग आता राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार असून एकूण १४ तालुक्यांना जोडणार आहे. या मार्गाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील २१ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना हा मार्ग जोडला जाईल. यामुळे नागपूर ते गोवा हे अंतर अवघ्या ८ तासांत कापणे शक्य होणार आहे.


- केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील मार्गांतही सरकारने बदल केले आहेत. आता हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, बीड, लातूर आणि सातारा या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करेल. याव्यतिरिक्त नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमेतून जाणाऱ्या मार्गाची रचनाही नव्याने करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील