New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात मोठे बदल केले आहेत. नव्या नियोजनानुसार महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले असून, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन सीमावर्ती तालुक्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येकी पाच अशा एकूण १० गावांचा समावेश या महामार्गात करण्यात आला आहे.


धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या या महामार्गाचा मूळ आराखडा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाच्या विरोधामुळे वादात सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने तांत्रिक फेरबदल करून स्थानिकांचा विरोध कमी करण्यासाठी नवीन मार्ग निश्चित केला आहे. नव्या आराखड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्गमधील सीमावर्ती गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



नव्याने समाविष्ट झालेली नवीन गावे


सावंतवाडी तालुका : केगद (चौकुळ), डेगवे, बांदा, पडवे आणि माजगाव.


दोडामार्ग तालुका : कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे.



२१ धार्मिक स्थळांना जोडणार


- शक्तीपीठ महामार्ग आता राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार असून एकूण १४ तालुक्यांना जोडणार आहे. या मार्गाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील २१ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना हा मार्ग जोडला जाईल. यामुळे नागपूर ते गोवा हे अंतर अवघ्या ८ तासांत कापणे शक्य होणार आहे.


- केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील मार्गांतही सरकारने बदल केले आहेत. आता हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, बीड, लातूर आणि सातारा या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करेल. याव्यतिरिक्त नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमेतून जाणाऱ्या मार्गाची रचनाही नव्याने करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून