Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.अमोल यादव, व्यवस्थापक सतीश वराडे, शैलेंद्र जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत कृषी पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्रे, आस्थापना विषयक बाबी तसेच ई-नाम संदर्भातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यभर उपलब्ध असलेल्या सुविधा केंद्रांचा अधिक प्रभावी वापर करून कृषीमालाची प्रक्रिया वाढविणे, त्याची निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत विक्री सुलभ करणे यावर भर देण्यात आला. यामुळे काढणीनंतरच्या हाताळणीतील नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. विविध देशांच्या मागणीनुसार कृषीमालाची गुणवत्ता, ट्रेसिबिलिटी आणि पॅकेजिंग यावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास निर्यात वाढीस चालना मिळू शकते, असे मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.


आंबा हंगाम २०२६ सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विकीरण (irradiation) प्रक्रियेच्या सुविधा केंद्रांच्या नियोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी अतिरिक्त अमेरिकन निरीक्षक उपलब्ध करून देण्याबाबत अपेडाकडे पाठपुरावा करावा. महाराष्ट्रातील कृषीमालाला इतर राज्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी विविध राज्यांमध्ये अभ्यास दौरे करावेत, असे आदेश मंत्री रावल यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Honeybee Attack: वेरूळ लेणीमध्ये मधमाशांचा हल्ला; १०० पर्यटक जखमी, एकाची प्रकृती गंभीर

छत्रपती सांभाजीनगर : वेरूळ लेणी परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक

Pune : चिमुरडीच्या आरोपीची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार; नवले पुलावरील आंदोलन थांबले, वाहतूक पुन्हा सुरू

पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा

नसरापूरच्या ग्रामस्थांचे पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन; बालिकेवर अत्याचार-खून प्रकरणाचे संतप्त पडसाद

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना

Pune Nasarapur Crime : आधी पुतणीवर अतिप्रसंग, मग महिलेवर अत्याचार अन् आता 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी; भोरमधील नराधमाचा काळा इतिहास उघड!

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण

Mother's Name Will On Document : आता हजेरीपत्रक आणि गुणपत्रिकेवर आईचं नाव अनिवार्य; सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून