Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.अमोल यादव, व्यवस्थापक सतीश वराडे, शैलेंद्र जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत कृषी पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्रे, आस्थापना विषयक बाबी तसेच ई-नाम संदर्भातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यभर उपलब्ध असलेल्या सुविधा केंद्रांचा अधिक प्रभावी वापर करून कृषीमालाची प्रक्रिया वाढविणे, त्याची निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत विक्री सुलभ करणे यावर भर देण्यात आला. यामुळे काढणीनंतरच्या हाताळणीतील नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. विविध देशांच्या मागणीनुसार कृषीमालाची गुणवत्ता, ट्रेसिबिलिटी आणि पॅकेजिंग यावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास निर्यात वाढीस चालना मिळू शकते, असे मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.


आंबा हंगाम २०२६ सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विकीरण (irradiation) प्रक्रियेच्या सुविधा केंद्रांच्या नियोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी अतिरिक्त अमेरिकन निरीक्षक उपलब्ध करून देण्याबाबत अपेडाकडे पाठपुरावा करावा. महाराष्ट्रातील कृषीमालाला इतर राज्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी विविध राज्यांमध्ये अभ्यास दौरे करावेत, असे आदेश मंत्री रावल यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात