Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे उद्घाटन;


मुंबई : विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीत वारंवार अडथळा ठरणाऱ्या 'बँडविड्थ'च्या समस्येवर आता प्रभावी तोडगा काढला जाणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रक्रियेत अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत, अत्याधुनिक इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता असलेली डेटा सेंटर्स शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.


जागतिक स्तरावरील आघाडीची डेटा सेंटर कंपनी 'इक्विनिक्स'च्या मुंबईतील 'एमबी३' या पहिल्या स्वमालकीच्या डेटा सेंटरचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मुंबईत ३.७ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात कंपनीने ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ६ हजार कोटी रुपये) इतकी मोठी गुंतवणूक केली आहे. हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर तिथे ४ हजार २०० हून अधिक कॅबिनेट्सची क्षमता उपलब्ध असेल. हे केंद्र केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानानेच सुसज्ज नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवांसाठीही सक्षम आहे. हायब्रिड मल्टी-क्लाउड सुविधेमुळे हे केंद्र जगभरातील ११ हजार ग्राहकांशी जोडले जाणार आहे.



यवतमाळच्या सौर प्रकल्पातून ऊर्जेची पूर्तता


पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा भाग म्हणून या डेटा सेंटरसाठी लागणारी ६० टक्के ऊर्जा सौर प्रकल्पातून मिळविली जात आहे. यासाठी यवतमाळ येथे २६.६ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करतानाच ऊर्जेची शाश्वतता जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.


शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी बँडविड्थ वाढवणे गरजेचे आहे. इक्विनिक्सच्या या प्रगत केंद्रामुळे सरकारी प्रणालींची कार्यक्षमता वाढेल आणि पर्यायाने सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)