मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाला न बोलवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं आहे. महेश उद्धव भणगे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून, त्याने राहत्या घरी विष प्राशन करुन हे टोकाचं पाऊल उचललं.


आपल्या जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता. त्यातूनच, त्यानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती असून याप्रकरणी, पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.


नेमकं काय घडलं ?


या तरुणानं आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्यानं रात्री ८ वाजताच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीनं अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. पण, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


आत्महत्येपूर्वी महेशनं आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो" असं हृदयद्रावक स्टेटस ठेवलं होतं. गेल्या सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यावेळी महेशला मित्रांनी बोलावलं नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केलं.


या घटनेमुळे तो नैराश्येत गेला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकच तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Saranjam land : कोल्हापुरातील ११ हजार ३९४ हेक्टर सरंजाम जमिनी अखेर 'फ्री-होल्ड'

- चंदगड तालुक्यातील ६० हजार लोकसंख्येचा ५५ वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटला; नजराण्याची ५४ लाखांची रक्कमही

Sachin Ahir : कामगार ते उपसभापती'... संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत सचिन अहिरांनी दिली निष्पक्ष कामकाजाची ग्वाही

उपसभापती पदाची गरिमा राखत प्रत्येक सदस्याला समान न्याय देणार - सचिन अहिर मुंबई : राजकीय व्यासपीठावर राजकारण जरूर

Snake Venom Bank : राज्यात 'सर्पविष बँक' स्थापन होणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- सर्पदंशाला 'नोटिफाईड डिसिज' घोषित करण्याबाबत सकारात्मक मुंबई : राज्यात सर्पदंश आणि त्यामुळे होणाऱ्या

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यावर रेड-ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार ३० जून ते ६ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची

IVF center : विनापरवानगी 'आयव्हीएफ सेंटर' चालवणाऱ्यांवर मकोका लावणार

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; पुढील अधिवेशनात कायद्यात सुधारणा करण्याची ग्वाही मुंबई : राज्यात वाढत असलेली

Jalgaon : जळगाव स्थानकावर मोठा अनर्थ टळला! धावत्या अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग

Jalgaon Railway Station : जळगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. मुंबईहून अमृतसरकडे धावणाऱ्या