मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाला न बोलवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं आहे. महेश उद्धव भणगे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून, त्याने राहत्या घरी विष प्राशन करुन हे टोकाचं पाऊल उचललं.


आपल्या जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता. त्यातूनच, त्यानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती असून याप्रकरणी, पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.


नेमकं काय घडलं ?


या तरुणानं आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्यानं रात्री ८ वाजताच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीनं अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. पण, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


आत्महत्येपूर्वी महेशनं आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो" असं हृदयद्रावक स्टेटस ठेवलं होतं. गेल्या सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यावेळी महेशला मित्रांनी बोलावलं नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केलं.


या घटनेमुळे तो नैराश्येत गेला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकच तपास करत आहेत.

Comments
Add Comment

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक