Shivshahi Bus Fire : धावत्या शिवशाही बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० हून अधिक प्रवाशांचे प्राण

धुळे : धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला बुधवारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमधून धुराचे लोट निघताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. (Shivshahi Bus Fire)


मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारहून धुळ्याकडे येणारी शिवशाही बस नगाव बारी परिसरात पोहोचली असताना अचानक बसच्या इंजिनाच्या भागातून धूर येऊ लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला वेढा घातला. आग पाहताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. (Shivshahi Bus Fire)



मात्र, चालकाने धीर न सोडता तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, तोपर्यंत आगीने बसचा मोठा भाग जळून खाक झाला होता. (Shivshahi Bus Fire)



प्राथमिक माहितीनुसार, बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला असून, चालकाच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (Shivshahi Bus Fire)




Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी