Navnath Ban : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा जनतेनेच शाहिस्तेखान केला

- भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर प्रहार


मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची बोटे छाटण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतच केले असल्याचा घणाघात करत त्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचे काम जनतेने केले आहे. कधीकाळी राज्यातील मोठा पक्ष असलेल्या उबाठाने आपल्या पक्षाचा आत्मा सोडला असून ती कॉंग्रेसच्या वळचणीला गेल्याचा प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते.


राजकारणातील संवेदनशीलतेबाबत बोलायचे तर या संवेदनशीलतेला नख लावण्याचे काम उबाठाने केले आहे. नारायण राणे, कंगना राणावत आणि मोहित कुंबोज यांचे घर पाडणे, व्यंगचित्र काढले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे, ही असंवेदनशीलतेचीच उदाहरणे आहेत. महाविकास आघाडीच्या राज्यातच केतकी चितळे तसेच पत्रकारांचा आवाज दडपण्यासाठी त्यांनाही अटक झाली तेव्हा संवेदनशीलतेवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांनी कधीच गमावला आहे, अशी टीका बन यांनी केली.


बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यावी याबाबत उबाठा आणि संजय राऊत यांच्यात संभ्रम आहे. संजय राऊत यांनी आतापासूनच कॉंग्रेसची तळी उचलण्याचे धोरण अवलंबले आहे. आताच ते कॉंग्रेसचा उदो उदो करत आहेत. कारण आणखी काही वर्षांनी आपल्याला कॉंग्रेसमध्येच जायचे आहे हे त्यांनी ठरवलेलेच आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात अशा नेत्यांपेक्षा आपल्यालाच कॉंग्रेस अधिक कळते असे दाखवून संजय राऊत यांना राहुल गांधी यांना प्रभावित करायचे असल्याचे नवनाथ बन यांनी सुनावले.


भाजपाने नाती जपली नाहीत असा आरोप संजय राऊत करत आहेत. मात्र ज्यांनी स्वत:च्या भावाचे नाते जपले नाही त्यांनी भाजपाबद्दल बोलू नये. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. मात्र उबाठाने अमित ठाकरे यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला तेव्हा त्यांना नाती आणि परंपरा आठवली नाही का, असा सवाल बन यांनी केला.


महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी रिक्षा आहे, जिची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशांना जातात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमध्ये यातील घटक पक्षांचे एकमत होत नाही. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत. गटबाजीचे राजकारण होत महाविकास आघाडी गटबाजीत गटांगळ्या खात असल्याची सणसणीत टीका नवनाथ बन यांनी केली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली