Navnath Ban : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा जनतेनेच शाहिस्तेखान केला

- भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर प्रहार


मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची बोटे छाटण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतच केले असल्याचा घणाघात करत त्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचे काम जनतेने केले आहे. कधीकाळी राज्यातील मोठा पक्ष असलेल्या उबाठाने आपल्या पक्षाचा आत्मा सोडला असून ती कॉंग्रेसच्या वळचणीला गेल्याचा प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते.


राजकारणातील संवेदनशीलतेबाबत बोलायचे तर या संवेदनशीलतेला नख लावण्याचे काम उबाठाने केले आहे. नारायण राणे, कंगना राणावत आणि मोहित कुंबोज यांचे घर पाडणे, व्यंगचित्र काढले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे, ही असंवेदनशीलतेचीच उदाहरणे आहेत. महाविकास आघाडीच्या राज्यातच केतकी चितळे तसेच पत्रकारांचा आवाज दडपण्यासाठी त्यांनाही अटक झाली तेव्हा संवेदनशीलतेवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांनी कधीच गमावला आहे, अशी टीका बन यांनी केली.


बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यावी याबाबत उबाठा आणि संजय राऊत यांच्यात संभ्रम आहे. संजय राऊत यांनी आतापासूनच कॉंग्रेसची तळी उचलण्याचे धोरण अवलंबले आहे. आताच ते कॉंग्रेसचा उदो उदो करत आहेत. कारण आणखी काही वर्षांनी आपल्याला कॉंग्रेसमध्येच जायचे आहे हे त्यांनी ठरवलेलेच आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात अशा नेत्यांपेक्षा आपल्यालाच कॉंग्रेस अधिक कळते असे दाखवून संजय राऊत यांना राहुल गांधी यांना प्रभावित करायचे असल्याचे नवनाथ बन यांनी सुनावले.


भाजपाने नाती जपली नाहीत असा आरोप संजय राऊत करत आहेत. मात्र ज्यांनी स्वत:च्या भावाचे नाते जपले नाही त्यांनी भाजपाबद्दल बोलू नये. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. मात्र उबाठाने अमित ठाकरे यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला तेव्हा त्यांना नाती आणि परंपरा आठवली नाही का, असा सवाल बन यांनी केला.


महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी रिक्षा आहे, जिची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशांना जातात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमध्ये यातील घटक पक्षांचे एकमत होत नाही. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत. गटबाजीचे राजकारण होत महाविकास आघाडी गटबाजीत गटांगळ्या खात असल्याची सणसणीत टीका नवनाथ बन यांनी केली.

Comments
Add Comment

U18 Asia Cup : U18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय

पुरुषांची सुवर्ण तर महिलांची कांस्यवर मोहोर काकामिगाहारा : भारतीय युवा हॉकीसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.

Women's Under-18 Hockey : भारतीय महिला संघाची कांस्यपदकावर मोहोर

काकामिगाहारा : भारतीय महिला अंडर-१८ हॉकी संघाने महिला १८-वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी करत

Devendra Fadnavis : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे प्रकटीकरण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; 'संविधानविरोधी कृत्यांनी त्यांचा खरा चेहरा उघड केला' मुंबई : "राजधानी

IND vs AFG : गिलचा मुल्लानपूरमध्ये विक्रमांचा पाऊस; धोनी-गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम

Raigad : १९६२ पशुवैद्यकीय हेल्पलाईन आता व्हॉट्सअ‍ॅपवर

अलिबाग : गेल्या पाच वर्षांत भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम