Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न


मुंबई : पाकिस्तानकडून कोलकात्यावर हल्ल्याची दिलेली धमकी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केल्याने तणाव वाढला आहे. विशेष म्हणजे सियालकोट ते कोलकाता हे हवाई अंतर सुमारे १६०० ते १७०० किमी असून रस्त्याने ते २ हजार किमीपेक्षा अधिक आहे. तरीही पाकिस्तानकडे इतक्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.



‘शाहीन-३’ हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र :


या दाव्याचा आधार म्हणजे ‘शाहीन-३’ हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. सुमारे २,७५० किमी रेंज असलेले हे पाकिस्तानचे सर्वात लांब पल्ल्याचे शस्त्र मानले जाते. २०१५ मध्ये याची पहिली चाचणी घेण्यात आली होती आणि आता ते पूर्णपणे कार्यान्वित असल्याचे सांगितले जाते. सॉलिड फ्यूलवर चालणारे हे क्षेपणास्त्र ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचरद्वारे प्रक्षेपित केले जाऊ शकते. पारंपरिक तसेच आण्विक वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता त्यात आहे.


शाहीन-३ व्यतिरिक्त पाकिस्तानकडे शाहीन-२ (१८०० किमी), शाहीन-१ (७५० किमी), गौरी (१५०० किमी) आणि बाबुर क्रूझ मिसाइल यांसारखी इतर क्षेपणास्त्रेही आहेत. ‘अबाबिल’ हे MIRV तंत्रज्ञान असलेले क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. या सर्व क्षेपणास्त्रांमुळे भारतातील अनेक मोठी शहरे त्यांच्या टप्प्यात येतात, असा पाकिस्तानचा दावा आहे.



‘शाहीन-३’ ला ‘अग्नी-५’ चोख उत्तर देणार :


मात्र तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या धमक्या प्रामुख्याने सामरिक प्रतिबंधासाठी दिल्या जातात. भारताकडेही अत्याधुनिक आणि अधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत. ‘अग्नी-५’सारख्या मिसाइलची रेंज सुमारे ७००० किमी आहे. याशिवाय भारताची मल्टी-लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टम शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.


त्यामुळे पाकिस्तानच्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात असले तरी भारताची संरक्षण क्षमता लक्षात घेता कोणतीही संभाव्य परिस्थिती हाताळण्याची तयारी मजबूत असल्याचे स्पष्ट होते.

Comments
Add Comment

Sikkim Landslide : सिक्कीमच्या जलविद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना; बोगदा कोसळून २० जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

सिक्कीम : सिक्कीम (Sikkim) मधील नामची (Namchi) जिल्ह्यात एनएचपीसी (NHPC) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पातील (Hydroelectric Project)

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा