- मदरशांमध्ये डॉक्टर-इंजिनिअर नव्हे, दहशतवादी तयार होतात
मुंबई : "मुंब्रा-कळवा परिसर हिरवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही शंभर जन्म घेतले तरी तुमचे हे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. हा कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही, तर हे आमच्या हिंदू राष्ट्रातील 'मुंब्रादेवी'चे क्षेत्र आहे. ज्याप्रमाणे आम्ही इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' केले, त्याचप्रमाणे लवकरच मुंब्र्याचे अधिकृत नाव 'मुंब्रादेवी' करून येथील हिंदू अस्मिता पुन्हा प्रस्थापित करू," असा वज्रनिर्धार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मुंब्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक भाषणातून जिहादी मानसिकता आणि हिंदूविरोधी शक्तींवर प्रहार केला. काही लोकप्रतिनिधींच्या चिथावणीखोर वक्तव्यांचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, "अशी विखारी विचारधारा मदरशांमधूनच बाहेर येते. मदरशांमध्ये बसवून कोणाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवले जात नाही, तिथे केवळ दहशतवादी तयार केले जातात. अशा सर्व मदरशांना कुलूप लावून या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे. धर्मांतरविरोधी कायद्यानंतर आता पुढचा नंबर हा मदरशांचाच असेल, हे लक्षात ठेवा."
मंत्री राणे म्हणाले, "आम्ही लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. आता जर कोणत्या शाहरुख किंवा आमिरने आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांना सात वर्षे तुरुंगाची हवा खावी लागेल. तिथे त्यांना साधे साबण उचलण्याचीही मुभा मिळणार नाही." त्याचप्रमाणे 'जितुद्दीन'सारख्या नेत्यांना मी सकाळी नाश्त्याला खातो', असा हल्लाबोलही त्यांनी केला.
हिंदूंची ताकद महत्त्वाची!
"मी कोणत्याही गोल टोपी किंवा दाढीवाल्यांच्या मतांनी आमदार-मंत्री झालेलो नाही. हिंदू समाजाने दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर मी इथे उभा आहे. आम्हाला त्यांच्या पाच मतांची चिंता नाही, कारण त्यांच्या पाच मतांच्या बदल्यात आमचा हिंदू समाज आम्हाला ५० मते देण्याची ताकद deveठेवतो," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'देवाभाऊ'चा हा महाराष्ट्र आहे. इथे मस्ती चालणार नाही. . .#prahaarnewsline #MarathiNews #niteshrane #maharashtra #DevendraFadnavis #muslman #hindu pic.twitter.com/TzGGrZgCsW
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) April 4, 2026
हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे...
मंत्री नितेश राणे म्हणाले, "हिंदू समाजाला घाबरवण्याचे प्रयत्न करू नका. जर आमचा तिसरा डोळा उघडला, तर शुक्रवारी तुमचे 'सिलेंडर'सुद्धा वर येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ. हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे, 'घुसेगा भी और मारेगा भी', असा इशाराही त्यांनी दिला.






