बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच आपल्याला या आंब्यांची चव चाखता येते, त्यामुळे संपूर्ण बाजार पिवळ्या आंब्यांची भरून जातो. पण हेच पिवळे धम्मक आंबे आपल्या आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार हैद्राबादमधून समोर आला आहे.



हैद्राबादमध्ये प्रकार उघडकीस


हैद्राबादच्या बाजारपेठेत बनावट आंब्याचा सुळसुळाट पसरला आहे, आणि आंबे खाल्ल्याने अनेक लोक आजारी पडत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी अचानक धड टाकत एका फळ विक्रेत्याकडून तब्बल २०० किलो बनावट आंबे हे जप्त केले आहेत. हैद्राबाद पोलिसांनी कडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.



बनावट आंबे कसे पिकवले जातात?


हाती आलेल्या माहितीनुसार हैद्राबाद खाद्य सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे शहराच्या विविध भागात छापे टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईदरम्यान अनेक धक्कदायक प्रकार उघडकीस आले. ग्राहकांच्या शरीराशी खेळले जाणारे आंबे हे कॅल्शिअम कार्बोइडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून २०० किलो आंबे आणि रसायनांची पाकिटे जप्त केली आहेत.



असे आंबे शरीरासाठी किती धोकादायक


रसायनांचा अति प्रमाणात वापर करून आंबे बाजारात विकले जात होते. कॅल्शियम कार्बोइडने पिकवलेले आंबे खाल्ल्याने घास खवखवणे, पोटात दुखणे उलट्या आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा फळांचे सेवन केल्यास मज्जासंस्था आणि श्वसनाचा गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.



प्रशासनाचे आवाहन


उन्हाळात आंब्यांची मागणी ही वाढत जाते. या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन जास्त आणि लवकर पैसे कमवण्यासाठी फळ विक्रेते बनावट आंबे विकून ग्राहकांना फसवतात. आणि याचा परिणाम ग्राहकांच्या शरीराशी होतो. ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी काही संशयास्पद आढळ्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद वाटल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बाजारातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी अशा अनैतिक मार्गांचा अवलंब करत असल्याने कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.