Monday, April 6, 2026

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभागातील पाणी प्रश्न उपस्थित केला होता. आपल्या प्रभागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून येथील पाणी प्रश्न सुटल्याचे नगरसेविका ऍड. म्हात्रे यांनी स्पष्ट केले. जनतेला दिलेला शब्द पुर्ण केला असून भाजपने करून दाखवलं अशी चर्चा होत आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता स्वतंत्र धरण असावे अशी मागणी नागरिकांनी केली असता भाजपा पदाधिकारी मिलिंद म्हात्रे यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रयत्न करत असून नक्कीच स्वतंत्र धरण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

पूर्वेकडील पी अँड टी कॉलिनी येथील काही इमारतींना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील नगरसेविका ऍड. कविता म्हात्रे व भाजपा पदाधिकारी मिलींद म्हात्रे यांच्याकडे येथील राहिवाशांनी आपली हि समस्या मांडली.

पी अँड टी कॉलिनी येथे काही इमारतीत पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशी वैतागले होते. येथील रहिवाशांनी भाजपा नगरसेविका ऍड.कविता म्हात्रे यांना पाणी समस्येबाबत माहिती दिली. नागरिकांच्या या गांभीर समस्येवर भाजपा नगरसेविका ऍड. म्हात्रे यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. येथे एकच पाणी लाईन असल्याची माहिती मिळताच नगरसेविका ऍड. कविता म्हात्रे व भाजपा पदाधिकारी मिलिंद म्हात्रे यांनी पालिकेच्या पाणी पूरवठा विभागाकडे मागणी करुन आणखी एक पाण्याची लाईन मंजूर करून घेतली.

पी अँड टी कॉलिनी प्रभाग पाणी टँकर मुक्त होणार !

कॉलनीत पाणी नाही म्हणून पाणी टँकर मागवित असल्याने त्यांच्या खिशाला भुर्दन्ड बसत होता. पाणी टँकर मुक्त प्रभाग हे स्वप्न यामुळे पुर्ण झाले असे महिला सांगत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >