BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत भविष्याची ही गरज ओळखून हे प्लांट सुुरु केले असले तरी प्रत्यक्षात प्लांट रुग्णालयात आहेत का असा सवाल करत स्थायी समितीने यापूर्वी बसवलेल्या ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार स्थायी समितीने प्रशासनाला याबाबतचे निर्देश दिले आहेत.


मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन वायूचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजुरीला असता काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी २०२०-२१ पासून ऑक्सिजन वायूचा पुरवठा केला जात असून आतापर्यंत हा पुरवठा सुरु आहे, मग वारंवार या कंपनीला मुदतवाढ का दिली जाते असा सवाल केला. कोविड काळात प्रत्येक ठिकाणी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारले त्याची आजची स्थिती काय आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी करत आझमी यांनी केली. यावर भाजपच्या शितल गंभीर यांनी सन २०२१ पासून सन २०२५ पर्यंत हे कंत्राट वाढवून देण्यात येत आहे. पण यातील जानेवारी ते मे २०२५ या कालावधीमध्ये केईएम, शीव आणि नायरमध्ये अतिरिक्त पुरवठा करावा लागला. त्यामुळे या अतिरिक्त वापराचे कारण काय याचा खुलासा करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी कोविड काळात ऑक्सिजन प्लांट होते, त्यांचे काय झाले आणि आज त्यांचे काय झाले अशी विचारणा यासर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करण्याची मागणी केली.


तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी काही तांत्रिक बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आणि अमेय घोले यांनी रेसकोर्सवरील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटचा विषय गंभीर आहे. त्यामुळे याचे ऑडीट व्हायलाच हवे. ऑक्सिजन प्लांटसाठी किती प्रावधान आहेत आणि किती ऑक्सिजन प्लांट आहे, हे सर्व प्रथम समोर यायला हवे असे सांगितले.त्यामुळे सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

Comments
Add Comment

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून