Chhatrapati Sambhajinagar News : अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा धुमाकूळ; ११ पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी मधमाशांनी दोन वेगवेगळ्या सत्रांत पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये देशी-विदेशी मिळून ११ पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. गेल्या दोन महिन्यांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असून, वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



एकाच दिवशी पर्यटकांवर सलग दोन हल्ले


अजिंठा लेणीत बुधवारी पर्यटकांना मधमाशांच्या भयावह हल्ल्याचा सामना करावा लागला. पर्यटकांची मोठी वर्दळ असताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. पहिली घटना सकाळी लेणी क्रमांक १० जवळ घडली, जिथे मोहळातून अचानक बाहेर पडलेल्या मधमाशांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या घटनेचा थरार संपत नाही तोच, तासाभराच्या अंतराने लेणी क्रमांक २६ परिसरात दुसऱ्यांदा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुहेरी संकटामुळे पर्यटकांची प्रचंड धावपळ उडाली आणि अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले.



अजिंठ्यात दोन महिन्यात पाचवा हल्ला


गेल्या अवघ्या ६० दिवसांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी वेळ असून, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांमध्ये, विशेषतः महिला आणि बालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दररोज हजारो पाऊले पडणाऱ्या या पर्यटनस्थळी सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा या मधमाशांसमोर हतबल ठरत आहे. जागतिक दर्जाचे केंद्र असूनही 'भारतीय पुरातत्व विभाग' (ASI) आणि पर्यटन विभाग कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असा संतप्त सवाल आता पर्यटकांकडून विचारला जात आहे. केवळ थातूरमातूर उपाय न करता, या मोहळांचा सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे अजिंठ्याच्या जागतिक प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



पर्यटकांनी ही काळजी घ्या


प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, लेणी परिसरात फिरताना गडद रंगाचे कपडे टाळावेत आणि सुगंधित द्रव्यांचा (Perfumes) वापर करू नये. कारण यामुळे मधमाशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा