Chhatrapati Sambhajinagar News : अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा धुमाकूळ; ११ पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी मधमाशांनी दोन वेगवेगळ्या सत्रांत पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये देशी-विदेशी मिळून ११ पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. गेल्या दोन महिन्यांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असून, वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



एकाच दिवशी पर्यटकांवर सलग दोन हल्ले


अजिंठा लेणीत बुधवारी पर्यटकांना मधमाशांच्या भयावह हल्ल्याचा सामना करावा लागला. पर्यटकांची मोठी वर्दळ असताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. पहिली घटना सकाळी लेणी क्रमांक १० जवळ घडली, जिथे मोहळातून अचानक बाहेर पडलेल्या मधमाशांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या घटनेचा थरार संपत नाही तोच, तासाभराच्या अंतराने लेणी क्रमांक २६ परिसरात दुसऱ्यांदा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुहेरी संकटामुळे पर्यटकांची प्रचंड धावपळ उडाली आणि अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले.



अजिंठ्यात दोन महिन्यात पाचवा हल्ला


गेल्या अवघ्या ६० दिवसांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी वेळ असून, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांमध्ये, विशेषतः महिला आणि बालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दररोज हजारो पाऊले पडणाऱ्या या पर्यटनस्थळी सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा या मधमाशांसमोर हतबल ठरत आहे. जागतिक दर्जाचे केंद्र असूनही 'भारतीय पुरातत्व विभाग' (ASI) आणि पर्यटन विभाग कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असा संतप्त सवाल आता पर्यटकांकडून विचारला जात आहे. केवळ थातूरमातूर उपाय न करता, या मोहळांचा सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे अजिंठ्याच्या जागतिक प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



पर्यटकांनी ही काळजी घ्या


प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, लेणी परिसरात फिरताना गडद रंगाचे कपडे टाळावेत आणि सुगंधित द्रव्यांचा (Perfumes) वापर करू नये. कारण यामुळे मधमाशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य