Chhatrapati Sambhajinagar News : अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा धुमाकूळ; ११ पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी मधमाशांनी दोन वेगवेगळ्या सत्रांत पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये देशी-विदेशी मिळून ११ पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. गेल्या दोन महिन्यांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असून, वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



एकाच दिवशी पर्यटकांवर सलग दोन हल्ले


अजिंठा लेणीत बुधवारी पर्यटकांना मधमाशांच्या भयावह हल्ल्याचा सामना करावा लागला. पर्यटकांची मोठी वर्दळ असताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. पहिली घटना सकाळी लेणी क्रमांक १० जवळ घडली, जिथे मोहळातून अचानक बाहेर पडलेल्या मधमाशांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या घटनेचा थरार संपत नाही तोच, तासाभराच्या अंतराने लेणी क्रमांक २६ परिसरात दुसऱ्यांदा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुहेरी संकटामुळे पर्यटकांची प्रचंड धावपळ उडाली आणि अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले.



अजिंठ्यात दोन महिन्यात पाचवा हल्ला


गेल्या अवघ्या ६० दिवसांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी वेळ असून, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांमध्ये, विशेषतः महिला आणि बालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दररोज हजारो पाऊले पडणाऱ्या या पर्यटनस्थळी सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा या मधमाशांसमोर हतबल ठरत आहे. जागतिक दर्जाचे केंद्र असूनही 'भारतीय पुरातत्व विभाग' (ASI) आणि पर्यटन विभाग कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असा संतप्त सवाल आता पर्यटकांकडून विचारला जात आहे. केवळ थातूरमातूर उपाय न करता, या मोहळांचा सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे अजिंठ्याच्या जागतिक प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



पर्यटकांनी ही काळजी घ्या


प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, लेणी परिसरात फिरताना गडद रंगाचे कपडे टाळावेत आणि सुगंधित द्रव्यांचा (Perfumes) वापर करू नये. कारण यामुळे मधमाशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.

Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली