Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' दिला आहे. दुसऱ्या बाजूला कृषी विभागाकडून मार्च महिन्यातील नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान बिघडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.


मार्चमध्ये झालेले नुकसान



राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सुमारे ६२ हजार ९६९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका यासह द्राक्ष, आंबा आणि केळी या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती आहे.


हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर उभे राहू नका. वीज उपकरणांचा वापर टाळावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा. वादळी वारे वाहत असल्यास कच्च्या बांधकामांपासून दूर राहा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! गोव्याहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ३ जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू