Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम १६ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने केली जात असून, प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा आहे, ज्याद्वारे प्रतिसादक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यापूर्वी १६ भाषांमध्ये आपली माहिती ऑनलाइन नोंदवू शकतात. या जनगणनेत डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशभरात ३० लाखांहून अधिक गणक, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी २०२७ ची जनगणना पार पाडतील. गणक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून एका मोबाईल ॲपद्वारे थेट डेटा गोळा करून सादर करतील.


भारताच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘जनगणना २०२७’ आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा, जो ‘घरयादी व घरगणना’ असा आहे, तो आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. ‘आपली जनगणना – आपला विकास’ या संकल्पनेवर आधारित ही प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पहिल्या टप्प्यात केवळ घरांची नोंदणी आणि घरांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन घराला क्रमांक देणे, घराचे स्वरूप (कच्चे/पक्के), पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आणि कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती घेतील.


माहिती गोपनीय ठेवली जाणार : ‘सार्वजनिक कल्याणासाठी जनगणना’ ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना घाबरून न जाता किंवा कोणतीही माहिती न लपवता वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिलेली सर्व माहिती कायदेशीररीत्या गोपनीय ठेवली जाणार असून, तिचा वापर केवळ लोककल्याणाच्या योजना आखण्यासाठीच केला जाणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे कुटुंबप्रमुखाकडून गणनाकाराला दिली जातील. गणनाकार ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल.


कोव्हिड महामारीमुळे विलंब : नियमानुसार, दर १० वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असते, त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना होणे नियोजित होते. मात्र, कोविड-१९ महामारीच्या संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली. २०११ मध्ये झालेली जनगणना ही १५ वी राष्ट्रीय जनगणना होती. त्यावेळी झालेल्या जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे ११.२४ कोटी इतकी नोंदवण्यात आली होती. २०२१ ची प्रलंबित जनगणना कोरोना महामारीनंतर विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना