Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम १६ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने केली जात असून, प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा आहे, ज्याद्वारे प्रतिसादक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यापूर्वी १६ भाषांमध्ये आपली माहिती ऑनलाइन नोंदवू शकतात. या जनगणनेत डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशभरात ३० लाखांहून अधिक गणक, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी २०२७ ची जनगणना पार पाडतील. गणक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून एका मोबाईल ॲपद्वारे थेट डेटा गोळा करून सादर करतील.


भारताच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘जनगणना २०२७’ आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा, जो ‘घरयादी व घरगणना’ असा आहे, तो आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. ‘आपली जनगणना – आपला विकास’ या संकल्पनेवर आधारित ही प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पहिल्या टप्प्यात केवळ घरांची नोंदणी आणि घरांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन घराला क्रमांक देणे, घराचे स्वरूप (कच्चे/पक्के), पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आणि कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती घेतील.


माहिती गोपनीय ठेवली जाणार : ‘सार्वजनिक कल्याणासाठी जनगणना’ ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना घाबरून न जाता किंवा कोणतीही माहिती न लपवता वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिलेली सर्व माहिती कायदेशीररीत्या गोपनीय ठेवली जाणार असून, तिचा वापर केवळ लोककल्याणाच्या योजना आखण्यासाठीच केला जाणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे कुटुंबप्रमुखाकडून गणनाकाराला दिली जातील. गणनाकार ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल.


कोव्हिड महामारीमुळे विलंब : नियमानुसार, दर १० वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असते, त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना होणे नियोजित होते. मात्र, कोविड-१९ महामारीच्या संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली. २०११ मध्ये झालेली जनगणना ही १५ वी राष्ट्रीय जनगणना होती. त्यावेळी झालेल्या जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे ११.२४ कोटी इतकी नोंदवण्यात आली होती. २०२१ ची प्रलंबित जनगणना कोरोना महामारीनंतर विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध