Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.



नेमकं प्रकरण काय?



मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली.


घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.



प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?



घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले, "आज सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. याच दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण मरण पावले आणि बरेच जण जखमी झाले. सर्व काही सुरळीत सुरू होते. अचानक चेंगराचेंगरी झाली आणि असे का घडले हे कळले नाही. लोक इकडेतिकडे धावू लागले. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेड आणि रांगा लावल्या होत्या. गर्दीच्या सुरक्षेसाठीही लोक उपस्थित होते. पण मला माहीत नाही की कोणी गोंधळ घातला आणि लोक इकडेतिकडे धावू लागले. ही जत्रा शतकानुशतके सुरू आहे. प्रत्येक वेळी सर्व काही सुरळीत पार पडते. यावेळी ही चेंगराचेंगरी कशी झाली हे मला माहीत नाही."


ज्या शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी गर्दी होते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक

Middle East War : इराण-इस्रायल युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, १० सैनिकही जखमी!

कुवेत सिटी : मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक व्यापक आणि हिंसक बनत चालला आहे. या