Middle East War : इराण-इस्रायल युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, १० सैनिकही जखमी!

कुवेत सिटी : मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक व्यापक आणि हिंसक बनत चालला आहे. या युद्धाची झळ केवळ स्थानिक देशांनाच नाही, तर तिथे रोजगारासाठी गेलेल्या भारतीयांनाही सोसावी लागत आहे. सोमवारी इराणने कुवेतच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करून केलेल्या भीषण हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुवेतच्या तेल आणि ऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, यामुळे कुवेत आणि इराणमधील राजनैतिक तणाव शिगेला पोहोचला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी परदेशात गेलेल्या भारतीय कामगारांसाठी हे युद्ध आता 'मृत्यूचा सापळा' ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेमुळे कुवेतमधील भारतीय समुदायात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे.



कुवेतच्या पाणी आणि वीज प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला


इराण आणि कुवेत यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, इराणने कुवेतच्या अत्यंत संवेदनशील नागरी सुविधांना लक्ष्य केले आहे. कुवेतच्या विद्युत मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, इराणकडून डागलेले एक क्षेपणास्त्र थेट एका पाणी शुद्धीकरण आणि वीज प्रकल्पावर येऊन आदळले. या भीषण हल्ल्यात प्रकल्पाच्या सेवा इमारतीत कार्यरत असलेल्या एका भारतीय नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण कुवेत शहराचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित होण्याची गंभीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास जवाहेर हयात यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, "इराणने केलेले हे थेट आक्रमक कृत्य आहे," असे स्पष्ट केले आहे. ऐन युद्धाच्या छायेत एका निरपराध भारतीय कामगाराचा बळी गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.



कुवेतमधील मृतदेह मायदेशी आणण्यासाठी दूतावासाची धावपळ


सध्या भारतीय अधिकारी कुवेती प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, संबंधित कंपनी आणि सरकारकडून पीडित कुटुंबाला योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठीही दूतावास पाठपुरावा करत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अबू धाबी येथे झालेल्या अशाच एका हल्ल्यात एका भारतीयाचा बळी गेला होता. त्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एकदा मध्य-पूर्वेतील संघर्षात एका निष्पाप भारतीयाला जीव गमवावा लागल्याने परदेशातील भारतीय कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



इराणच्या कुरापतींना कुवेतचे सडेतोड उत्तर; क्षेपणास्त्र हल्ल्यात १० सैनिक जखमी


इराणने केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कुवेतचा संयम सुटला असून, दोन्ही देशांमधील संबंध आता टोकाला पोहोचले आहेत. या भीषण हल्ल्यात केवळ नागरी मालमत्तेचेच नुकसान झाले नाही, तर कुवेती लष्कराचे १० जवानही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत कुवेतने इराणवर थेट हल्लाबोल केला आहे. कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख जर्राह जाबेर अल-सबाह यांनी इराणवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, इराण जाणीवपूर्वक संपूर्ण आखाती क्षेत्रात अस्थिरता आणि अराजकता पसरवत आहे. "इराण आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी दहशतवादी मार्गांचा अवलंब करत आहे," अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. या हल्ल्यामुळे आतापर्यंत तटस्थ राहू पाहणारा कुवेत देश आता उघडपणे इराणविरोधी गटात सामील होण्याची चिन्हे आहेत. इराणच्या या आक्रमक कृत्यामुळे मध्य-पूर्वेतील युद्धाचा वणवा अधिकच पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन