Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा

- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे खासदार रविंद्र वायकर यांनी केली मागणी


नवी दिल्ली : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पसंतीची दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल (Dadar-Ratnagiri passenger) पुनश्च दादर स्थानकातून सुरु करण्यात यावी तसेच शक्य असल्यास ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत विस्तारित करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलास द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी निवेदनाद्वारे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.


मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी आणि कुटुंबियांसाठी दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही केवळ एक रेल्वे नव्हती, तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. मागील २५–३० वर्षांपासून ही गाडी नियमितपणे दादर स्थानकापर्यंत धावत होती. परंतु कोविड काळात ही सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत ती फक्त दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित केली. यामुळे दैनंदिन कामकाज उरकून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सोईस्कर ठरणाऱ्या या गाडीची सेवा दिवा पर्यंतच सीमित करण्यात आल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त लोकल रेल्वेने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, खर्च आणि शारीरिक त्रास वाढतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी ही अडचण अधिक गंभीर ठरते. रस्त्याने प्रवास करायचा झाल्यास मुंबई–गोवा महामार्गाची स्थिती अनेक ठिकाणी अत्यंत खराब आहे, ज्यामुळे प्रवास कठीण आणि धोकादायक होतो. अशा परिस्थितीत ही पॅसेंजर रेल कोकणातील सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था होती, असे खासदार यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

खासदार वायकर यांनी दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी या विषयावर सविस्तर निवेदन रेल्वे मंत्री पाठवले होते. परंतु त्यानंतरही रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. हा केवळ रेल्वेचा मुद्दा नसून कोकणातील जनतेच्या भावना आणि त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषय असल्याने, यात लक्ष घालून दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल तात्काळ पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शक्य असल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत वाढवावी, ज्यामुळे मुंबईतील अधिकाधिक प्रवाशांना थेट आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी विनंती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.