PSL 2026 : शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझा यांच्यावर सुरक्षा नियम तोडल्याचा गंभीर आरोप

पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2026) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) संघातील कर्णधार शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यावर गंभीर गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत.



अनधिकृत व्यक्तींना प्रवेश :


पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, या दोन्ही खेळाडूंनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत चार अनधिकृत व्यक्तींना खेळाडूंच्या हॉटेलच्या मजल्यावर प्रवेश दिला. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तींना कथितरित्या त्यांच्या खोल्यांमध्ये नेण्यात आले आणि ते जवळपास तीन तास तिथेच थांबले.



प्रोटोकॉलचे उल्लंघन :


या घटनेमुळे हॉटेलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. लीगचे सीईओ सलमान नसीर यांना पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले की, संबंधित पाहुण्यांना प्रवेशासाठी परवानगी नव्हती. संघाच्या संपर्क अधिकाऱ्याची विनंतीही दोन वेळा नाकारण्यात आली होती. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा विरोध असूनही पाहुण्यांना आत नेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकाराला “प्रोटोकॉलचे स्पष्ट उल्लंघन” असे संबोधले असून, लीग आयोजकांनी या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


दरम्यान, सिकंदर रझा (Sikandar Raza) याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हॉटेलमध्ये आलेले पाहुणे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र होते. त्यांनी शाहीन आफ्रिदी यांना निर्दोष ठरवत संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.


या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच कडक भूमिका घेतली आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि ऊर्जा बचतीच्या कारणामुळे लीगमधील काही सामने प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हॉटेल आणि मैदान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, की हा वाद सामोपचाराने मिटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील