पार्थ पवार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात कमालीचे सक्रिय झाले आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अर्धा तास खलबते झाली. पार्थ पवार यांची नुकतीच राज्यसभेवर वर्णी लागली असून, ही केवळ सदिच्छा भेट होती की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत, याबाबत आता तर्क लढवले जात आहेत.


दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पार्थ पवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची आणि पक्षाची जबाबदारी पेलताना पार्थ पवार सातत्याने विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Comments
Add Comment

MHADA Lottery 2026 : म्हाडा मुंबई लॉटरी २०२६ जाहीर; एकूण २६४० घरांची सोडत निघणार

- २९ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम अर्ज करता येणार मुंबई : मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी उपलब्ध

Eknath Khadse : मोठी बातमी: खडसे पिता-कन्येवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपल्याचा आरोप!

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या

BMC : बीकेसीतील स्वच्छतेची महापालिकेला काळजी, यांत्रिक झाडूद्वारे केली जाते साफसफाई

- वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपयांचा केला जातो खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) वांद्रे कुर्ला संकुलातील संकुलात

Malad West Flyover : मालाड पश्चिम उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाच्या कंत्राटात महापालिकेचा अनोखा प्रयोग

- एल अँड टी पात्र, पण नुकसान भरपाईची ३५० कोटी रक्कम वाचवण्यासाठी जे कुमार आरपीएस कंपनीला दिले काम मुंबई (सचिन

Fertilizer Shortage : आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात खतांचा तुटवडा

मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या बांधापर्यंत पोहोचले

Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची