Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची पद्धत आहे. पण २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. पूर्ण राज्यात एकसमान शैक्षणिक वेळापत्रक सुरू ठेवण्याच्या उद्देशाने हा बदल केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांना २ मे २०२६ पासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे.


यंदा विदर्भासह सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून पासून होणार आहे. राज्यातील सर्व विभागांतील शाळांनी याच तारखेपासून नियमित अध्यापनास प्रारंभ करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.


विदर्भातील शाळा १५ ते २७ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरतील. हा अपवाद राज्याच्या उर्वरित भागांसाठी केला जाणार नाही. पण ३० जूनपासून राज्यातील सर्व शाळा नियमित वेळेनुसार भरतील.


राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ मेपासून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी लागू होईल. दरम्यान, इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळा सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र