Fertilizer Shortage : आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात खतांचा तुटवडा

मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांशी होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाल्याने याचा सर्वाधिक फटका खतनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याला बसला आहे. परिणामी, भविष्यात राज्यात युरियाचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


आखाती देशांतील युद्धामुळे शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर १०० टक्के परिणाम झाला. भारताचा मोठा शेतीमाल या देशांमध्ये निर्यात होतो; मात्र सध्या हा मार्ग ठप्प झाल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये मालाची आवक वाढली आणि भाव कोसळले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसत आहे. "निर्यात थांबल्याने स्थानिक बाजारात भाव पडले आहेत. खत निर्मितीच्या कच्च्या मालावर परिणाम झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते," असे भरणे यांनी स्पष्ट केले.


राज्यातील हवामान बदलाबाबत सतर्क करताना कृषी मंत्र्यांनी सांगितले की, १७ एप्रिलनंतर तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने जलसंकटाची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.


पंचनाम्यानंतर तातडीने मदत


राज्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. प्रशासनाकडून अंतिम अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे आश्वासनही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास