Marathwada Weather : मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) विभागात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.


अंदाजानुसार, या भागात वाऱ्यांचा वेग वाढून अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. उर्वरित राज्यात वातावरण ढगाळ राहून वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.


हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या बदलामागे दक्षिण कर्नाटक भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर तयार झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती कारणीभूत आहे. तसेच उत्तर ओडिशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाहात खंड पडल्यामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे वातावरण अस्थिर झाले असून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.


दरम्यान, शहरातील तापमानातही चढ-उतार दिसून येत आहेत, ज्यामुळे वातावरण अधिक दमट आणि अस्थिर झाले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, वादळी वाऱ्यांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा