रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार


धार्मिक कार्यात सहकार्याची आवश्यकता असल्यास संपर्क करा, मंत्री लोढा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


मुंबई : गिरगाव येथील ओम श्री सदगुरू साईनाथ रामनवमी पदयात्रा मंडळाच्या वतीने आयोजित भंडाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या गॅसची व्यवस्था करून दिल्याबद्दल राज्याचे कॅबिनेट मंगलप्रभात लोढा यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. रामनवमी निमित्त मंडळाच्या वतीने दरवर्षी पदयात्रा आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने भंडाऱ्याची व्यापक तयारी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गॅसची आवश्यकता भासल्याने मंडळाने मंत्री लोढा यांच्याकडे विनंती केली होती असे मंडळच्या उत्सव समितीचे पालखी प्रमुख राजू बोडके यांनी सांगितले.


इराण आणि अमेरिकादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या राज्यात इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा कार्यक्रम होणार की नाही, अशा चिंतेत कार्यकर्ते होते. मात्र मंत्री लोढा यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला निर्देश देत गॅसची व्यवस्था करून दिली. त्यामुळे भंडाऱ्याचे नियोजन सुरळीत पार पडण्यास मदत झाली असल्याचे बोडके यांनी सांगितले.


यासंदर्भात मंत्री लोढा यांना विचारले असता ते म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे म्हटले आहे. कुठेही इंधन पुरवठ्यात बाधा येणार नाही. तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात आवश्यक तेवढा गॅसचा साठा उपलब्ध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये असे जनतेला आवाहन केले आहे. धार्मिक कार्यात मला माझ्या मलबार हिल मतदार संघात सहकार्य करता आले, याचा मला अत्याधिक आनंद असल्याचेही लोढा यांनी सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही धार्मिक कार्यात सहकार्याची गरज असल्यास निःसंकोचपणे माझ्या मलबार हिल विधानसभेतील कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे. काही लोक केवळ या स्थितीत राजकारण करू पाहत आहेत. स्थानिक आमदार आणि मंत्री या नात्याने समरसता जपत मी धार्मिक कार्यात सहकार्य करत असल्याचे ही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांचा प्रवास!

मुंबई : मुंबईला वेगाने विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईशी जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी

चॅटबॉटमुळे नागरिकांना अचूक माहिती;

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५०

Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या