Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानचालन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.

'द कम्प्लीट मॅन' आणि 'फील्स लाइक हेवन' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून शून्यातून सुरुवात करून अब्जावधींची संपत्ती कमावणारे आणि आपली कंपनी जगभरात पोहोचवणारे रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानउद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.

भारताचे 'टेक्सटाईल टायकून' म्हणून ओळखले जाणारे विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ही घोषणा त्यांचे पुत्र आणि रेमंडचे सध्याचे मालक, गौतम सिंघानिया यांनी केली. आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात विजयपत सिंघानिया यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. त्यांनी यशाची सर्वोच्च पायरी चढली आणि प्रेमातील विश्वासघातही सहन केला. जेके हाऊसचे मालक आणि अब्जाधीश असलेल्या या व्यक्तीला एकेकाळी भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडले होते.

१९२५ मध्ये ठाण्यातील वाडिया मिल या लोकरीच्या गिरणीत सैन्यासाठी गणवेश शिवण्यापासून रेमंडची सुरुवात झाली. १९८० मध्ये रेमंडचा ताबा घेतल्यानंतर, विजयपत सिंघानिया यांनी रेमंडला मोठ्या उंचीवर नेलं. रेमंड केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही पोहोचला होता. त्यांनी भारताच्या वस्त्रोद्योगाला ओळख मिळवून दिली, पण एक वेळ अशी आली की, ज्या विजयपत यांनी आपल्या कपड्यांनी जगाला परिपूर्ण बनवलं होतं, त्यांनाच त्यांच्या लोकांनी बेघर केलं. एका सहीमुळे ते केवळ त्यांच्या कंपनीतूनच नव्हे, तर त्यांच्या ३४ मजली आलिशान घरातूनही बेघर झाले.

रेमंडला यशाच्या शिखरावर नेल्यानंतर, त्यांनी २०१५ मध्ये कंपनी आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्याकडे सोपवली. त्यांनी आपले सर्व शेअर्स, ज्यांचे मूल्य तेव्हा १००० कोटी रुपये होते, आपल्या मुलाला दिले आणि १२,००० कोटी रुपये किमतीची रेमंड कंपनी त्याच्या हवाली केली. कंपनी आणि शेअर्सवर ठेवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा त्यांना तितकाच मोठा विश्वासघात अनुभवायला मिळाला. याच एका कृत्यामुळे केवळ आपली संपूर्ण बचतच नव्हे, तर घर, गाडी आणि ड्रायव्हरसुद्धा गमवावा लागेल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.

विजयपत सिंघानिया यांनी स्वतःच आपल्या मुलावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी मुंबईत ३४ मजली जेके हाऊस बांधले, पण कंपनी मुलगा गौतमच्या हवाली करताच त्यांनी त्याच्या आई-वडिलांना त्याच घरातून जबरदस्तीने बाहेर काढले. त्यांनी केवळ घरच नाही, तर गाडी आणि ड्रायव्हर यांसारख्या मूलभूत सुविधाही काढून घेतल्या. इतकेच नाही, तर आपल्या नावापुढे 'चेअरमन एमेरिटस' ही उपाधी लावण्याचा हक्कही त्यांनी काढून घेतला.

रेमंडप्रमाणे अब्जावधींची संपत्ती कमावून एक बहुराष्ट्रीय कंपनी उभी करणाऱ्या आपल्याच मुलाने विश्वासघात केल्यामुळे, त्यांना आपल्या पत्नीसोबत दोन भाड्याच्या घरांमध्ये राहण्यास भाग पाडले. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा मुलगा गौतम त्यांना रस्त्यावर पाहून आनंदी झाला होता. "सर्व काही त्याच्या हाती सोपवणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती."

५,००० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेल्या विजपत सिंघानिया यांना उड्डाणाची प्रचंड आवड होती. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्यांनी जगातील सर्वात उंच हॉट एअर बलून उड्डाणाचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी रेमंडला यशाच्या शिखरावर नेले. त्यांनी १२,००० कोटी रुपयांची मालमत्ता, अब्जावधी डॉलर्सची रेमंड कंपनी आणि मुंबईतील मलबार हिल परिसरातील ३७ मजली जेके हाऊस आपल्या मुलाच्या नावावर केले. त्यानंतर ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं.
Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान