अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांचा प्रवास!

मुंबई : मुंबईला वेगाने विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईशी जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांनी प्रवास केला आहे. यामुळे भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूनं एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही माहिती एमएमआरडीए प्रशासनाने दिली.





नवा उच्चांक गाठणाऱ्या अटल सेतूचे १३ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन झाले. उद्घाटन झाल्यापासून, या पुलावर २ कोटींहून अधिक वाहनांच्या प्रवासाची नोंद झाली आहे. वाहनांच्या नोंदणीनुसार २७ मार्च २०२६ रोजी २,००,००,३१६ व्या वाहनाने अटल सेतूवरून प्रवास केला आहे. हा क्षण मुंबई महानगर क्षेत्रातील प्रत्येक प्रवासी, प्रत्येक कुटुंबासाठी विशेष आहे. या माध्यमातून नवीन जीवनवाहिनीनं क्रांती घडवून आणली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, असे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले.



अटल सेतूवरून २६ महिन्यांत...



  1. १,८१,९५,७१८ खाजगी वाहनांची पुलावरून वाहतूक. हा आकडा एकूण वाहतुकीच्या ९१% पेक्षा अधिक आहे.

  2. ५,९८,५२५ लघु व्यावसायिक वाहनं, मिनीबस, बस आणि ट्रकची पुलावरून वाहतूक.

  3. १२,०६,०७३ मध्यम, जड आणि अति-अवजड वाहनांच्या वाहतुकीची नोंद.


दुर्गम भाग ते मुख्य शहर, अवघ्या काही मिनिटांत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील चिरले या गावाशी जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ तासाभरावरून अवघ्या २० मिनिटांवर आला आहे. केवळ दोन वर्षांत या सेतूनं फक्त दळणवळणाची परिभाषा बदलली नाही, तर अर्थव्यवस्थेलाही गती दिली आहे. व्यापार वाढवणं, इंधनाचा खर्च कमी करणं, प्रवास सुलभ करणं आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे नवे मानक प्रस्थापित करणं हे या पुलानं साध्य केलं आहे.


अटल सेतू हा केवळ एक पूल नाही, तर ती मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. पुलावरून २ कोटी वाहनांनी प्रवास केल्यानंतर हे सिद्ध झालं आहे की, जेव्हा महाराष्ट्र काही घडवतो त्यात गतिमान भविष्याची झलक पाहायला मिळते, असे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले.



अटल सेतूचे फायदे


अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे, जो दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा-शेवाशी जोडतो. हा सहा मार्गिकांचा पूल आहे. शिवडी (मुंबई) ते न्हावा-शेवा (नवी मुंबई/चिर्ले) पर्यंतच्या भागाला जोडणारा हा पूल एकूण २१.८ किमी लांबीचा आहे. पुलाचा १६.५ किमीचा भाग समुद्रावर आणि ५.५ किमीचा भाग जमिनीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. हा पूल दक्षिण मुंबई, नवी मुंबई आणि जेएनपीटी (JNPT) बंदराला एकमेकांशी जोडतो. फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यात अटल सेतू एका प्रमुख सहाय्यकाची भूमिका बजावतो.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी